धन्यवाद लोकसत्ता ... .... Link to original article
मराठी पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी - All क्रेडीट goes to respective writer
Wednesday, September 29, 2010
जरा आरशात पाहा!
धन्यवाद लोकसत्ता ... .... Link to original article
Sunday, September 19, 2010
न्यायालय , सरकार आणि शेतकरी - अन मोफत धान्य
बादशहाच्या मंत्रिमंडळात सरळसरळ दोन तट पडले होते. राज्यातील हजारो गोदामांमध्ये धान्य साठविण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. हजारो पोती धान्य बाहेरच ठेवण्यात आले होते. पावसामुळे ते लाखो टन धान्य कुजून वाया चालले होते. हे सर्व धान्य गरीब आणि भुकेल्यांमध्ये वाटून देण्यात यावे, असा आदेश न्याय खात्याच्या वरिष्ठानं दिला होता. त्याचा हा आदेशच बादशहाच्या मंत्रिमंडळात दोन गट पाडण्यास कारणीभूत ठरला होता. दोन्ही गट हिरीरीनं आपली बाजू मांडत होते. फुकट धान्य वाटलं तर लोक माजतील, बाजारातील धान्याचे भाव खाली येतील, व्यापाऱ्याचं नुकसान होईल, लोकांना फुकटचं खायची सवय लागेल, शिवाय ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत धान्य न जाता ते भलतेच लोक पळवतील, अशा हरकती एक गट घेत होता. तर दुसरा गट न्यायखात्याच्या आदेशाकडे दयाबुद्धीनं पाहत होता. धान्य खाऊन उंदीर माजतील, त्यापेक्षा माणसं माजली तर काय हरकत आहे? एका बाजूला धान्य सडते आहे आणि दुसऱ्या बाजुला माणसं उपाशी मरत आहेत, हे राज्याला शोभतं का? बादशहाला काही भावना आहेत की नाहीत? धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या नुकसानाची काळजी करण्यापेक्षा कष्टकरी गरिबांचं पोट भरणं महत्त्वाचं नाही का? असे प्रश्न दुसऱ्या बाजूकडून विचारले जात होते. दोन्ही बाजू आपापल्या परीनं योग्य होत्या. दोन्ही बाजूंचे मुद्दे विचार करण्यासारखे होते. त्यामुळे अगदी हमरीतुमरीवर येऊन चर्चा सुरू होती. बादशहा गोंधळून गेला होता, कारण कोणतीही बाजू घेतली तरी ते अडचणीचं होतं. याच मुद्दय़ाच्या आधारे भविष्यात इतर प्रश्नांचीही सोडवणूक करण्याचा पायंडा पडण्याची भीती होती. बादशहाच्या दृष्टीनं त्यातही अधिकच काळजीचा विषय हा होता की, संपूर्ण चर्चेत बिरबलानं तोंडही उघडलेलं नव्हतं. आणि या प्रकरणी बिरबल निरूत्तर झाल्याचं दिसत असल्यानं दोन्ही गटांमधील बिरबलाच्या विरोधकांना अधिकच चेव आला होता. अखेर बादशहानं जेव्हा अगदीच कासावीस होऊन बिरबलाकडे पाहिलं, तेव्हा बिरबल उभा राहिला. सगळे शांत झाले. बिरबलानं बादशहाला कुर्निसात केला आणि म्हणाला, ‘हुजूर, आपण आधी हे मान्य केलं पाहिजे की दोन्ही बाजूंचे मुद्दे आणि हरकती अगदीच योग्य आहेत.’ बादशहा म्हणाला,‘बिरबल, ते मान्य आहे म्हणूनच तर गंभीर पेच निर्माण झाला आहे ना?’ मग बिरबलानं चौफेर नजर फिरवली आणि म्हणाला, ‘दोन्ही बाजूचे मुद्दे जरी योग्य असले तरी ही चर्चा फिजूल आहे, असं मला वाटतं.’ बादशहासह सगळेच आश्चर्यचकित होवून पाहू लागले. बिरबल पुढे म्हणाला, ‘मोफत धान्य वितरित करणं योग्य की आयोग्य यावर आपण बोलू शकतो. परंतु ते करावं की करू नये, यावर चर्चा करू शकत नाही.’ बादशहा गोंधळला व म्हणाला,‘म्हणजे?’ बिरबल हसला व म्हणाला, ‘म्हणजे असं की, न्याय खात्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्यानं धान्य मोफत वितरित करण्याचा आदेश दिला आहे. तो पाळणं बंधनकारक आहेच. तो पाळण्यात यावा आणि मगच चर्चा जरी ठेवावी! माझ्या मते,न्यायासनाचा आदेश पाळण्याची बांधिलकी स्वीकारायची की नाही हा चर्चेचा विषय होऊच शकत नाही.तो योग्य की अयोग्य यावर मात्र चर्चा होऊ शकते.’ बादशहानं बिरबलाकडे ज्या नजरेनं पाहिलं त्यात केवळ कौतुक किंवा कृतज्ञता नव्हती!
Thanks to लोकसत्ता Link to original article
Sunday, September 5, 2010
मुलांच्या निरागस भावविश्वाला वास्तवाचे चटके देणं म्हणजे सगळा आनंद घालवणं आहे
राज्यभर सगळीकडे धुवाँधार पाऊस सुरू होता. सर्व नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सगळे व्यवहार थंडावले होते. रस्त्यांवर वर्दळ नव्हती. दुकाने बंद होती. बादशहा आपल्या महालाच्या नक्षीदार झरोख्यातून आभाळाची माया बरसताना पाहत होता. भरपूर पाऊस पडत असल्याने तो वारंवार परवर दिगारचा शुक्रियाही अदा करीत होता. एकूणच काही कामकाज नसल्याने तो दोन बेगम व त्यांच्या मुलांसाठी वेळ देत होता. मुलांनी आग्रह केला तेव्हा त्यांनी त्यांची गोष्टीची पुस्तके वाचली. जादूच्या, राक्षसांच्या, राजा-महाराजांच्या, राजपुत्रांच्या, शूरवीरांच्या अशा प्रकारच्या भरपूर गोष्टी त्याने मजेने वाचल्या आणि मग अचानक त्याच्या लक्षात आले, सर्व गोष्टींचे शेवट ‘आणि ते सुखाने नांदू लागले’ असाच असे. बादशहा विचार करू लागला आणि मग त्याला ते अधिकच खटकू लागले. त्याने सांस्कृतिक मंत्र्याला तातडीने बोलावून घेतले व ‘बाल साहित्याची स्थिती कशी आहे?’ असा प्रश्न केला. मंत्री खरे तर हादरलाच. बादशहाला अचानक बाल साहित्याच्या स्थितीची चिंता का पडावी आणि त्याच्या मनात नेमके काय आहे ते त्याला कळत नव्हते आणि तसे स्पष्ट सांगण्या- विचारण्याचीही सोय नव्हती. मंत्री कामाला लागला व त्याने दोन दिवसांत बादशहाला आपला अहवाल सादर केला. ‘‘हुजूर, आपल्या राज्यात बालकथा लिहिणारे साधारणत: पाचशे लेखक आहेत. वर्षभरात जवळपास ३ हजार पुस्तके प्रकाशित होतात आणि त्यातल्या उत्कृष्ट पुस्तकांना आपण पुरस्कारही देतो’’ बादशहानं नाराजीनं मान हलविली आणि म्हणाला, ‘‘यापैकी बहुतांश कथांचे शेवट.. आणि ते सुखानं नांदू लागले.. अशा वाक्यानं होतो. लहान मुलांची ही दिशाभूल आहे. दु:ख, निराशा, अपयश, अपेक्षाभंग हा जीवनाचा एक भाग आहे हे त्यांना कळू द्या, सर्व लेखकांना तसे आदेश द्या.’’ मंत्री हवालदिल झाला आणि मान हलवून ‘जी खाविंद’ म्हणाला. आठवडाभरानं पाऊस जरा कमी झाला आणि मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा बादशहानं मंत्र्याला पुढील कारवाईबाबत विचारणा केली. मंत्र्यानं बिरबलाकडे पाहिलं तेव्हा बिरबलानं त्याला, काळजी करू नकोस, असं नजरेनंच सांगितलं. बैठक संपल्यावर बिरबल बादशहाच्या समवेत राजवाडय़ावर गेला. त्याच्या आदेशाप्रमाणं तिथं एक नक्षीदार पेटी आधीच आणून ठेवलेली होती. बिरबलानं इशारा करताच सेवकांनी ती पेटी उघडली आणि सोनेरी नक्षीनं वेढलेली बादशहाची एक तस्वीर त्यातून काढली. बिरबलानं तसबिरीला हार घातला, समोर उदबत्त्या लावल्या आणि हात जोडले. ते पाहून बादशहा लाल होऊन संतापानं थरथरू लागला. ‘बिरबल, तू काय चालविलं आहेस हे?’ बिरबल शांतपणे म्हणाला, ‘हुजूर, मी, तुम्ही, आपण सगळेच कधी तरी मरणार आहोत. तुमच्या मुलांना आपण आताच हे सत्य सांगून टाकावं असं वाटलं मला!’ अर्थातच सर्व प्रकार बादशहाच्या ध्यानी आला व तो वरमला. बादशहाची ती मुद्रा पाहून बिरबल म्हणाला, ‘‘खाविंद, मुलांच्या निरागस भावविश्वाला वास्तवाचे चटके देणं म्हणजे सगळा आनंद घालवणं आहे. जगात खूप काही चांगलं आहे, अशी आशा त्यांच्या मनात निर्माण करणं आवश्यक असतं, ती मोठी होतात आणि या आशेच्या बळावरच वास्तवाला सामोरी जातात!’’ बादशहा म्हणाला, ‘सुखानं नांदू लागले’चं महत्त्व मला खरंच कळत नव्हतं. बिरबल हसत म्हणाला, ‘‘खाविंद, लहान मुलांच्या पुस्तकांविषयी तुम्ही एवढय़ा गांभीर्यानं विचार केला ते मला जास्त महत्त्वाचं वाटलं.’’ ढगाळ वातावरणात उत्तम प्रतीचा चहा घेण्यासाठी बिरबलानं मग आग्रह करून शिक्षण मंत्र्यालाही बोलावून घेतलं!
धन्यवाद लोकसत्ता ... .... Link to original article
धन्यवाद लोकसत्ता ... .... Link to original article
गोविंदा ... दहीहंडी : मूठभर निराशेतली चिमूटभर आशा !
पावसामुळं सगळे व्यवहार थंडावलेले होते. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीला उपस्थित असलेले सर्व मंत्रीही आळसावलेले होते. सगळं वातावरण असं सुस्तावलेलं पाहून बादशहानं रेशमी कबाब बनविण्याचा आदेश दिला. खमंग कबाब आणि पुदिन्याची ताजी पाने चांदीच्या नक्षीदार थाळ्यांमध्ये आली तेव्हा मग शेरो-शायरी गप्पा यांना ऊत आला. एकेक मजेदार किस्से सांगितले जाऊ लागले आणि वातावरण अगदी खुमासदार झाले. मध्येच बादशहानं हात उंचावला आणि म्हणाला, ‘तुम्हा सगळ्यांनाच माझा एक प्रश्न आहे, ज्याचं तुम्ही उत्तर द्यायचं ते लगेच सिद्धही करून दाखवायचं आणि उत्तर वैशिष्टय़पूर्णही हवं!’ सर्व मंत्र्यांनी एका स्वरात उत्तर दिलं, ‘कुबुल खाविंद!’ मग बादशहानं मसालेदार चहाचा एक घोट घेतला व आपला प्रश्न विचारला, ‘जगण्यासाठी काय हवं असतं?’ सर्व मंत्री, हा म्हटलं तर सोपा आणि म्हटलं तर अवघड प्रश्न ऐकून विचारात पडले. प्रश्नाचं उत्तर लगेचच सिद्ध करणं हे एक मोठं आव्हान होतं. अखेर एक ज्येष्ठ मंत्री उभा राहिला आणि म्हणाला, ‘खाविंद, जगण्यासाठी सुख हवं असतं असं मला वाटतं, परंतु ते आत्ता लगेच सिद्ध नाही करता येणार!’ बादशहा म्हणाला, ‘सुखाचा लवकरच कंटाळा येतो हे सार्वकालिक सत्य आहे.’ प्रत्येक मंत्री मनातल्या मनात बादशहाच्या प्रश्नाचं उत्तर जुळवत होता; परंतु ते उत्तर लगेचच सिद्ध कसं करावं हा पेच त्याला पडत होता. अखेर सर्व मंत्री बिरबलाला आग्रह करून म्हणाले, ‘आता तूच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकशील.’ मग बादशहानंही आग्रह धरला तेव्हा बिरबल म्हणाला, ‘जगण्यासाठी मूठभर निराशा आणि चिमूटभर आशा हवी असते आणि यात कोणत्याही काळात बदल झालेला नाही, होणारही नाही.’ बादशहानं उत्तरावर समाधान व्यक्त केलं आणि म्हणाला, ‘परंतु हे तू आत्ताच्या आत्ता सिद्ध कसं करून दाखवशील?’ बिरबल म्हणाला, ‘दाखवतो, पण त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत इथून बाहेर पडावं लागेल.’ मग सगळेच तिथून एकत्र बाहेर पडले. बाहेर एका चौकात प्रचंड गर्दी होती. लोक मद्यधुंद, बेहोष होऊन नाचत होते. चौकाच्या मध्यभागी पन्नास लाखांची दहीहंडी बांधलेली होती. त्या गर्दीला गोविंदाच्या सांस्कृतिक परंपरेशी काही देणं-घेणं नव्हतं. सर्वाचं लक्ष होतं पन्नास लाखांवर! ते पाहून बादशहा भयंकर निराश झाला. मग बिरबल बादशहाला घेऊन दुसऱ्या एका चौकात गेला, तिथं दहीहंडीला पैसे वगैरे नव्हते, फक्त दहीकाल्याचे मटके बांधलेले होते, काही लोक उत्साहाने पाणी फेकत होते, परंतु गर्दी नव्हती. खरं तर शुकशुकाटच होता. ते पाहून बादशहा म्हणाला, ‘पैसे नसूनही गोविंदा मंडळं थर उभारताहेत ही केवढी आनंदाची गोष्ट आहे!’ बिरबल म्हणाला, ‘‘यालाच मी मूठभर निराशेतली चिमूटभर आशा म्हणतो!’ बिरबलाच्या या उत्तरानं खूश झालेल्या बादशहानं संपूर्ण मंत्रिमंडळालाच आग्रहानं दुपारच्या शाही खान्यासाठी थांबवून घेतलं!
धन्यवाद लोकसत्ता ... .... Link to original article
धन्यवाद लोकसत्ता ... .... Link to original article
Subscribe to:
Posts (Atom)