Wednesday, March 16, 2011

पैशाचा फंडा : अमेरिकन अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची कारणे

 चूकीच्या धोरणातून संस्था जेंव्हा दिवाळखोरीच्या उंबरठयावर उभ्या राहील्या तेंव्हा त्यांना वाचवण्यासाठी अमेरिकन सरकारने सामान्य नागरिकांचा पैसा त्यांना सावरण्यासाठी वापरला. त्यामुळे खाजगी वित्तीय संस्थांचा तोटा सामान्य करदात्यांच्या पदरात टाकला गेला.  यालाच privatisation of profit and socialisation of losses म्हणजेच नफा मात्र खाजगी उद्योजकांचा आणि तोटा मात्र सर्व समाजाचा अशा प्रकारची भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. 




E-mail

न्युयॉर्कला गेल्यावर टाईम्स स्क्वेअरला भेट देणे हा महत्वाचा क्रार्यक्रम असतो.  चोवीस तास येथे जगातील प्रत्येक देशाच्या नागरिकांची वर्दळ असते.  दोन चार दिवस रहायचा योग आला तर ब्रॉडवे वरील नाटयगृहात संगीत नाटक पहाता येते.  हयातली बरीचशी नाटके १०-१२ वष्रे त्याच नाटयगृहात चाललेली असतात.
हयाच टाईम स्क्वेअरचा अविभाज्य भाग होता लेहमन ब्रदर्स १५० वर्षांहूनही अधिक अमेरिकेच्या आíथक प्रगतीची निशाणी अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाची गुंतवणूक क्षेत्रात काम करणारी बँक. आज अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील सर्व दोषांचे ती प्रतीक बनली आहे.
एखादी कंपनी बंद पडल्याने वा दिवाळखोरीत गेल्याने देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येत नाही.  अमेरिकेतील एन्रॉनच्या बाबतीतही असे झाले.  एन्रॉनला दिवाळखोरी जाहीर करावी लागली.  एन्रॉनच्या गुहागर मधील प्रकल्पाबाबत महाराष्ट्रात वादळ उठले, दाभोळ वीज प्रकल्प बंदही पाडण्यात आला. मात्र एन्रॉन अमेरिकेतील कोसळण्यापाठची कारणे वेगळी होती.
लेहमन ब्रदर्स कोसळल्यानंतर अमेरिकन अर्थव्यस्थेमधील मूलभूत दोष लोकांच्या नजरेत आले.  अशा दोषांवर उभारलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये नव्याने गुंतवणूक करणे अशक्यप्राय होते.  योग्य पसा कुणी अयोग्य ठिकाणी गुंतवत नाही.  इंग्रजीत हयाला Good money chasing bad money असे म्हणतात.
सब प्राईम कर्जे आणि हया कर्जाच्या केलेल्या क्रेडिट डेरिव्हेटिव्ह्ज आपण मागच्या लेखात पाहिल्या.  हया अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणाऱ्या अजून दोन कसंल्पना आपण पाहुयात.  त्या म्हणजे लिव्हरेज फायनान्स आणि क्रेडिट डिफॉल्ट स्वाप.
अमेरिकन अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची दोन मुळ कारणे म्हणजे वित्तीय धोका हाताळण्याची चुकीची पध्दत आणि घरांच्या घसरत गेलेल्या किंमती.
लिव्हरेज फायनान्स हे काय प्रकरण आहे? अगदी साध्या उदाहरणातून आपण हे पाहूयात, समजा, तुम्ही १ लाख रूपयांत घर विकत घेतले.  त्याची संपूर्ण किंमत तुम्ही साठवलेल्या पशातून किंवा एकही रूपया कर्जाने न घेता दिला  हया घराची किंमत वर्षभरात १० हजार रूपयांनी वाढली. हयाचा अर्थ एक लाखाच्या गुंतवणूकीवर वर्षभरात तुंम्हाला १० टक्के फायदा झाला.  उत्तम!
समजा हेच १ लाख रूपयांचे घर मी माझे स्वतचे १० हजार रूपये भरून आणि उरलेले ९० हजार रूपये बँकेतून ६ टक्के व्याज दराने घेतले तर ९० हजार रूपयांवर वर्षांचे व्याज ५४०० रूपये झाले.
वर्षभरात हया घराची किंमत १० हजार रूपयांनी वाढली तर तुम्ही भरलेल्या १० हजार अधिक ५४०० (बँकेचे व्याज) रूपयांवर तुंम्हाला ६५ टक्के फायदा झाला.  तुम्ही साठवलेले १ लाख रूपये भरलेत तेंव्हा फायदा १० टक्के झाला.  बँकेचे कर्ज घेऊन व्याज भरूनही तुमचा फायदा ६५ टक्के झाला. हयात तुमचे लिव्हरेज होते १०:१.
हयाच्याही पलिकडे, हेच घर तुम्ही स्वतकडचे १००० रूपये भरून उरलेले ९९ हजार रूपये बँकेचे कर्ज ६ टक्के व्याजाने घेतले तर तुम्हाला व्याजापोटी ५९४० रूपये भरावे लागतील.  हयाच घराची किंमत एका वर्षांत १० हजार रूपयांनी वाढल्यावर तुमचे १० हजार रूपये अधिक ५९४० रूपये बँकेचे व्याज धरूनही तुमचा फायदा १४४ टक्के होतो. हयात तुमचे लिव्हरेज होते १००१.
असाच व्यवहार अमेरिकेतील बँका १९९० पासून करीत होत्या.  त्यांचे लिव्हरेजचे प्रमाण ३०१ पर्यंत गेले होते.  आपल्या कडील बँकांबाबतीत आरबीआय हे प्रमाण 81 पलिकडे जाऊ देत नाही.  हया अशा लिव्हरेज प्रमाणात अमेरिकेतील बँका अब्जावधी डॉलर्सच्या उलाढाली करीत होत्या.  अमेरिकन सरकारचे पाठबळ असलेल्या प्र्रेडी व फॅनी हया सारख्या गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांनी तर लिव्हरेजचे प्रमाण १००१ पर्यंत नेले होते.  जोवर घरांच्या किंमती दरवर्षी वाढत होत्या तोवर हा मधूचंद्र उत्तम प्रकारे चालला होता.  घरांच्या किंमती खाली यायला लागल्यावर मात्र चित्र पालटले.
पहिल्या उदाहरणात तुम्ही स्वतचे १ लाख रूपये भरून घर घेतलेत. त्यामुळे त्याची किंमत पुढच्या वर्षी ३० हजार रूपयांनी कमी झाली आणि तरीही तुम्ही घर विकत नाही तोवर हा तोटा फक्त कागदोपत्रीच राहतो.
हया उलट, तुम्ही स्वतचे १००० रूपये देऊन बँकेचे ९९००० रूपये कर्जाने घेता आणि दुसऱ्या वर्षी घरांची किंमत जेंव्हा ६०००० रूपये पर्यंत घसरते तेंव्हा घेतलेल्या कर्जासाठी तारण अपूरे पडते.  बँक तुंम्हाला तातडीने २९ हजार रूपये भरायला सांगते.
मुळात घर घेतांनाही तुमच्या कडे स्वतचे १ हजार रूपये होते त्यामुळे हे २९ हजार रूपये तुमच्याकडे असण्याची शक्यता नाही.  घराची किंमत घसरल्याने हया घरावर दुसऱ्या बँकेकडून कर्ज मिळण्याची शक्यताही नाही.  अखेर बँकेला हे घर परत करण्यावाचून गत्यंतर नाही.  अमेरिकेतील लाखो कर्जदारांवर ही पाळी आली.  लेहमन ब्रदर्स सारख्या गुंतवणूक क्षेत्रातील बँकांच्या स्टॉक बाबतही असाच प्रकार घडला.
लिव्हरेज मुळे नफा जसा कित्येक पटीने वाढू शकतो तसाच तोटाही कित्येक पटीने वाढू शकतो. हे लिव्हरेज लोक नेहीम बँकेकडून कर्ज घेऊन त्या जोरावर स्थावर मालमत्ता विकत घेऊन तसेच क्रेडिट डेरिव्हेटिव्ह्जच्या सहाय्याने करतात.
आता अमेरिकेतील आíथक क्षेत्रात जे नवे र्निबध येत आहेत त्यात हया लिव्हरेज प्रमाणावरही नियंत्रण येत आहे.  पण त्या आधी त्यांना हे प्रमाण हाताबाहरे गेल्यामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवावे लागतील.
हया लिव्हरेज फायना न्स मुळे निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी वित्तीय संस्थांशी क्रेडिट डिफॉल्ट स्वापची निर्मिती केली आहे. हे स्वाप म्हणजे एक प्रकारची विमा योजना आहे. मी १ लाख रूपयांचे कर्ज देतो त्यावेळी तुम्ही वेळच्या वेळी हप्ते भरले नाही तर माझा तोटा होऊ नये म्हणून हे कर्ज मी दुसऱ्या बँकेला विकतो. मला डिफॉल्ट स्वाप विकणाऱ्या बँकेला मी दरमहा फी देतो.  यदाकदाचित तुम्ही कर्ज बुडविलेत तर तुम्ही देऊ लागत असलेले व्याज व मुद्दल ही बँक मला देते.
समजा तुम्ही १ लाख रूपयांची हेल्थ पॉलिसी घेतलीत आणि त्यासाठी दर वर्षी १० हजार रूपयांचा हप्ता भरायला सुरूवात केली की तुमच्या आजारपणात १ लाख रूपयांपर्यंत पसे देण्याची जबाबदारी विमा कंपनीची असते.  पण वीमा कंपनी तुमची पॉलिसी मला विकते आणि त्यासाठी तुमच्याच हप्त्यातून दरमहा मला ५००० रूपये द्यायला सुरूवात केली. दुर्दैवाने तुम्ही आजारी पडलात आणि पॉलिसीचे पसे हॉस्पिटल मध्ये भरण्याची वेळ आली तर हे पसे भरण्यासाठी वीमा कंपनी माझ्याकडे बोट दाखवते. मी हे पसे नवे घर घेण्यात गुतवले त्यामुळे हे हॉस्पिटलला देणे शक्य नाही. त्यांत पुन्हा घराच्या किंमतीही खाली घसरलेल्या.  त्यामुळे मला दिवाळखोरी जाहिर करण्यावाचून गत्यंतर नाही.  अमेरिकेत हाच खेळ जागतिक पातळीवर अब्जावधी डॉलर्सच्या उलाढालीत खेळला गेला.  ही क्रेडिट डिफॉल्ट स्वाप्स, रशिया, फोरिया, अर्जेटिना, मेक्सिको अशा देशांना दिलेल्या कर्जाच्या बाबतीतही केली. त्यामुळे प्रत्यक्ष पसे देण्याची वेळ आली त्यामुळे त्यांच्या पुढे पशाच्या उपलब्धतेचे प्रश्न उभे राहीले.
लेहमन ब्रदर्स जरी लयाला गेली तरी फ्रेडी व फॅनी तसेच एआयजी मरील लिच सारख्या वित्तीय संस्थांना वाचवण्यासाठी अमेरिकन सरकारला अब्जावधी रूपयांचे कर्ज आणि आíथक पाठबळाची शाश्वती द्यावी लागली.  अन्यथा त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोसळली असती.  भारतात असे घडले नाही. अमेरिकेत घडलेल्या आíथक उत्पाताचे पडसाद आपल्या आíथक क्षेत्रांवरही उमटले.  परंतु कोणत्याही वित्तीय संस्थेला वाचवण्यासाठी भारत सरकारला अíथक मदत देण्याची वेळ आली नाही.  आपली अर्थव्यवस्था सबळ असण्याचे हे चिन्ह आहे.
१९९० पासून सातत्याने सबप्राईम कर्जाच्या बळावर हया वित्तीय संस्था नफा दाखवत होत्या. तेंव्हा त्यांचा नफा भागधारकांना तसेच व्यवस्थानामध्ये वाटून दिला जात होता.  आता त्यांच्या चूकीच्या धोरणातून संस्था जेंव्हा दिवाळखोरीच्या उंबरठयावर उभ्या राहील्या तेंव्हा त्यांना वाचवण्यासाठी अमेरिकन सरकारने सामान्य नागरिकांचा पैसा त्यांना सावरण्यासाठी वापरला. त्यामुळे खाजगी वित्तीय संस्थांचा तोटा सामान्य करदात्यांच्या पदरात टाकला गेला.  यालाच privatisation of profit and socialisation of losses म्हणजेच नफा मात्र खाजगी उद्योजकांचा आणि तोटा मात्र सर्व समाजाचा अशा प्रकारची भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे.


Link to original article
loksatta

अणुऊर्जेवर प्रश्नचिन्ह


अणुबॉम्ब आणि अणुभट्टी यातील सीमारेषा यात एका श्वासाचे अंतर असते. अणुभट्टी एकदा सुरू झाली की तिच्यावर शंभर टक्के नियंत्रण असावेच लागते. यात एखादय़ा टक्क्यानेही कमी-जास्त होऊन चालत नाही. कारण असे नियंत्रण, मग ते कोणत्या का कारणाने असेना, एकदा का सुटले की अणुभट्टीच मग अणुबॉम्बसारखी वागायला लागते, हे वास्तव आहे.
न्यूयॉर्कमध्ये हडसन नदीच्या किनाऱ्यावर इंडियन पॉइंट या अनाकलनीय नावाच्या अणुभट्टीची उभारणी होत असताना, आसपासच्या जनतेच्या मार्गदर्शनासाठी संबंधित कंपनीने एक पुस्तकच तयार केले होते. अणुभट्टीत अपघात झाल्यास त्याला कशा प्रकारे तोंड देता येऊ शकेल, याची माहिती प्रश्नोत्तराच्या रूपात त्यामध्ये देण्यात आली होती. त्यातील पहिलाच प्रश्न होता, स्फोट होऊन अणुभट्टी उद्ध्वस्त होऊ शकते का? आणि उत्तर होते, तशी शक्यता अजिबात नाही. ही घटना सुमारे ४० वर्षांपूर्वीची. त्यावेळी आधुनिक दहशतवादाचा जन्म व्हायचा होता. जपानमधे सध्या जे काही घडत आहे, त्यामुळे दहशतवादी हल्ल्याशिवायही अणुभट्टीचा स्फोट होऊ शकतो, हे भीतिदायक वास्तव समोर आले आहे. अति शक्तिशाली, अगदी पाताळच ढवळून काढू शकेल, अशा भूकंपाने या अणुभट्टीचा वीजपुरवठाच खंडित केला. अशा प्रसंगात वीजपुरवठय़ासाठी आणखी दोन पर्यायांची व्यवस्था केलेली असते. डिझेलवर चालणारा जनरेटरही असतो आणि बॅटरीने वीजपुरवठा अबाधित राहील अशीही सोय असते, पण जपानमध्ये हे काही चालले नाही. तीनही पर्याय कुचकामी ठरल्याने अणुभट्टीतील तापमान वाढत राहिले. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे सर्व प्रयत्न फसल्यावर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि या भट्टय़ांचा स्फोट झाला. परिस्थिती तितकी गंभीर होणार नाही, असे सुरूवातीला वाटत होते. त्यामुळे अणुभट्टीच्या परिसरात दहा किमी परिघात राहणाऱ्यांनाच सुरक्षित स्थळी हलवले गेले. पण या अपघाताचे गांभीर्य लक्षात आल्यावर हा परीघ २० किमीपर्यंत वाढवावा लागला. अजूनही या अणुभट्टय़ांतून किती प्रमाणात किरणोत्सार झाला आहे आणि तो कितपत धोकादायक आहे, याचा तपशील दिलेला नाही. जगभरात अणुभट्टय़ांभोवती नेहमीच एक प्रकारचे संशयाचे धुके असते. जपानही त्याला अपवाद नाही. त्यामुळेच अणुऊर्जा उद्योगापुढे जपानमधील घटनेमुळे उभे राहणारे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. प्रसारमाध्यमांच्या आधुनिकीकरणानंतर, कॅमेऱ्यासमोर झालेला हा पहिला अणुअपघात. जगभरात कोटय़वधी लोकांनी डोळ्यांसमोर अणुभट्टी उद्ध्वस्त होताना पाहिली. त्यामुळेही या अपघाताची गहराई वाढली.जपानमधील ही दुर्दैवी अणुभट्टी दाई इचि कंपनीसाठी अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक या कंपनीने बनवलेली होती. १९७१ साली तिच्यातून वीजनिर्मिती सुरू झाली. तिच्या स्फोटाचा हादरा पॅसिफिक ओलांडून दूर अमेरिकेत बसला. कारण अमेरिकेत अगदी तशाच आराखडय़ात काम करणाऱ्या, जनरल इलेक्ट्रिकनेच बनवलेल्या २३ अणुभट्टय़ा आजही वीजनिर्मिती करीत आहेत. त्यामुळे जपानमधील अणुभट्टी ही एखाद्या बॉम्बसारखी फुटल्याने काळजाचा ठोका चुकला तो अमेरिकेचा. म्हणजे अशाच क्षमतेचा भूकंप अमेरिकेत झाला तर जपानी अणुभट्टीप्रमाणे अमेरिकेतही अणुभट्टी फुटण्याचा धोका आहे, या वास्तवानेच अमेरिकेला घाम फुटला. रविवारी अमेरिकेत सीबीएस या खासगी वाहिनीवरच्या ‘फेस द नेशन’ या लोकप्रिय कार्यक्रमात कनेक्टिकटचे सेनेटर जोसेफ लिबरमन यांनीच खुद्द ही कबुली दिल्याने अमेरिकेत आता अणुऊर्जेचा नव्याने आढावा घेण्याची गरज मोठय़ा प्रमाणावर व्यक्त होऊ लागली आहे. वास्तविक १९७९ साली पेनसिल्वेनिया राज्यातल्या थ्री माईल आयलंडवरील अणुभट्टीत अपघात झाल्यानंतर अमेरिकेत जवळपास १४ अणुभट्टय़ांची उभारणी थांबवण्यात आली. युरोपीय देशांतही अणुऊर्जेबाबत तितका उत्साह नाही. जगाला दररोज जितकी वीज लागते त्यातील फक्त १५ टक्के वीज ४४२ अणुभट्टय़ांत तयार होत असते. आजमितीला जगभरात जवळपास १५५ अणुभट्टय़ांची उभारणी सुरू आहे. यातील बऱ्याचशा अणुभट्टय़ा तिसऱ्या जगातील देशांत आहेत, हे ओघाने आलेच. यात आघाडीवर आहे तो चीन. आज या देशात १३ अणुभट्टय़ा आहेत, त्या चीनला २७ पर्यंत न्यायच्या आहेत. आपल्या देशात सहा अणुप्रकल्पांत मिळून २० अणुभट्टय़ा आहेत. इ.स. २०३२ पर्यंत ६४ हजार मेगा वॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट आपण ठेवलेले आहे. आज या सगळय़ाचाच फेरविचार केला जावा, अशी मागणी पुढे आली आहे आणि ती अवास्तव आहे, असे म्हणता येणार नाही. आपल्या खुद्द अणुऊर्जा महामंडळाचे अध्यक्ष एस.के. जैन यांनी परदेशी वृत्तसंस्थांशी बोलताना जपानमधील घटनेमुळे आम्हाला आमच्या योजना तपासून बघणे भाग पडणार आहे, अशी कबुली दिली. त्याचवेळी, या वृत्तसंस्थांनी फ्रान्सच्या अरेवा कंपनीच्या प्रवक्त्या पॅट्रिशिया मारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी जपानच्या अपघातावर भाष्य करण्यास नकार दिला. गेली काही वर्षे, विशेषत: ग्लोबल वॉर्मिगची हवा तापल्यापासून सर्व ऊर्जा समस्यांना अणुऊर्जा हा रामबाण उपाय असल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. जगभरातून अणुभट्टय़ांना वाढती मागणी होती. त्यातूनच न्युक्लियर रेनेसां- आण्विक पुनरूत्थान हा शब्द जन्माला आला. ही अणुभट्टय़ांची मागणी अशीच वाढत राहील आणि त्यामुळे या भट्टय़ा बनवणाऱ्या कंपन्या आणि युरेनियमच्या खाण कंपन्या यांनाही बरे दिवस येतील, असे मानले जात होते. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी जानेवारी महिन्यात राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात अणुऊर्जेचे मोठे आशादायी चित्र रंगवले होते, पण जपानमध्ये जे काही घडले त्यामुळे अनेक देशांत अणुऊर्जेविरोधात मोठी लाटच आली आहे. खुद्द अमेरिकेत न्युक्लिअर रेग्युलेटरी कमिशनने देशातल्या सर्वच्या सर्व म्हणजे १०४ अणुभट्टय़ा सुरक्षित आहेत, याची ग्वाही दिली. पण त्याच वेळी सर्व यंत्रणेची पाहणी नव्याने करण्याचा निर्णय घेतला. जपानमधील घटनेचा थेट परिणाम म्हणजे अणुऊर्जेच्या क्षेत्रात जे खसगी गुंतवणूकदार पुढे येत होते, ते आता हात आखडता घेताना दिसू लागलेत किंवा आपल्या गुंतवणुकीच्या आणि त्यावरच्या परताव्याबाबतच साशंक  झालेत. आज दोन दिवसांच्या सुटीनंतर बाजार उघडल्यावर या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे समभाग गडगडले ते याचमुळे. युरोपात तर ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. अनेकांच्या मनात यामुळे चेनरेबिल दुर्घटनेच्या करपवून टाकणाऱ्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळच्या सोव्हिएत रशियात आणि आजच्या युक्रेनमध्ये असलेल्या चेर्नोबिल या छोटय़ा गावातली अणुभट्टी २६ एप्रिल १९८६ला अचानक ‘वेडय़ासारखी वागू लागली’. तीमधून इतकी वीज तयार व्हायला लागली की, तिचा भार अणुभट्टीलाच झेपेना. अखेर ती फुटून मोठय़ा प्रमाणावर आसपासच्या परिसरात किरणोत्सर्ग झाला आणि जवळपास चार हजार जणांनी त्यात प्राण गमावले. अर्थात चेनरेबिलमध्ये आणि परवा जपानमध्ये जे काही घडले आणि अजूनही शमलेले नाही, ते अणुभट्टी स्फोट प्रकरण हे पूर्णपणे वेगळे आहे, यात जराही शंका नाही. किंबहुना चेर्नोबिलनंतर जगभरातल्या अणुऊर्जा तंत्रज्ञानात मोठय़ा प्रमाणावर सुधारणा झाली, हेही निर्विवाद खरे. पण तरीही अणुभट्टीचा अपघात शंभर टक्के टाळता येईल याची शाश्वती नाही, हे तज्ज्ञही मान्य करू लागलेत. याचे कारण असे की अणुबॉम्ब आणि अणुभट्टी यातील सीमारेषा यात एका श्वासाचे अंतर असते. अणुभट्टी एकदा सुरू झाली की तिच्यावर शंभर टक्के नियंत्रण असावेच लागते. यात एखादय़ा टक्क्यानेही कमी-जास्त होऊन चालत नाही. कारण असे नियंत्रण, मग ते कोणत्या का कारणाने असेना, एकदा का सुटले की अणुभट्टीच मग अणुबॉम्बसारखी वागायला लागते, हे वास्तव आहे. पण विकास हवा असेल तर ऊर्जा लागते, हे नाकारता येत नाही. आणि विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या जगभरातील कोटय़वधी वंचितांचे दुर्दैव असे की, ऊर्जेचे उपलब्ध असलेले पर्याय मर्यादित आहेत. कोळशामुळे पर्यावरणास धोका पोहोचतो, म्हणून तो नको. धरणे बांधायची तर विस्थापितांचा प्रश्न येतो, त्यामुळे त्यांना विरोध. तेलाचेही तसेच. ते जाळल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढून हवामान बदल होतो, म्हणून तेही नको. परत या तेलाची पंचाईत अशी की ते सापडते काही विशिष्ट भूभागांत आणि त्यावरही नियंत्रणही आहे ते विशिष्टांचे. जगात दररोज तयार होणाऱ्या तेलातला २६ टक्के वाटा एकटय़ा अमेरिकेच्याच ‘पोळी’वर ओतला जातो. त्यामुळेही त्याबाबतही अनेक देशांत ताणतणाव आहेत. गेल्या वर्षी इराण आणि रशिया यांनी एकत्र येऊन अमेरिकेच्या याच वर्चस्वाला आव्हान देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या दोन देशांनी पुढाकार घेतला कारण तेलाला पर्याय ठरू शकणारा नैसर्गिक वायू या दोन देशांत मोठय़ा प्रमाणावर सापडतो. त्या आधी रशियाच्या उंबरठय़ावर जॉर्जियात लढाई झाली ती याच वायूवरील मालकी हक्कातून. जपानमधील दुर्घटनेमुळे हे सगळे प्रश्न अधिकच गंभीर वाटणार आहेत. हे गांभीर्य लगेच कमी होण्याची शक्यता नाही.  

Link to original article http://bit.ly/fZne77

Wednesday, January 26, 2011

महाराष्ट्राचा झाला बिहार

अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळले


प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला इंधन भेसळखोरांचे कृत्य
‘महाराष्ट्राचा बिहार होऊ घातला आहे’ हे वाक्य आता इतिहासजमा झाले असून गुंडगिरीमध्ये आता महाराष्ट्राने बिहारला खूप मागे टाकले आहे, असे म्हणण्याची पाळी आली आहे. ‘कायद्याच्या राज्या’चे अस्तित्वच उरलेले नाही अशी भीषण घटना आज नाशिक जिल्ह्यातील पानेवाडी येथे घडली. भर रस्त्यावर इंधनतेलाची भेसळ करणाऱ्या गुंडांच्या टोळीला अटकाव करण्याचे धाडस दाखविणारे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना या गुंडांनी त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळले. भर रस्त्यात आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या जळितकांडाने संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. पानेवाडीत हे जळितकांड घडत असताना ठाण्यात राजकारणी व बिल्डरांचे काळे व्यवहार उघडय़ावर आणण्याचे धाडस दाखविणाऱ्या आणि माहिती अधिकार कायद्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विक्रांत कर्णिक या कार्यकर्त्यांवर काही अज्ञात गुंडांनी पानेवाडीप्रमाणेच दिवसाढवळ्या आणि भररस्त्यातच प्राणघातक हल्ला केला. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येस पोलीस, न्यायालय, शिक्षा अशा कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता करण्यात आलेल्या हल्ल्याच्या या दोन घटनांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे जाहीरपणे टांगली गेली आहेत.

इंधन भेसळीला अटकाव करण्यासाठी गेलेले मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे (४७) यांना अक्षरश: जिवंत जाळण्यापर्यंत भेसळखोरांची मजल गेल्याने त्याबद्दल सर्वत्र शोकसंतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या अत्यंत घृणास्पद आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेचे तीव्र पडसाद प्रशासकीय पातळीवर उमटले असून त्याच्या निषेधार्थ येत्या २७ तारखेला राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रमुख संशयित पोपट शिंदे याच्यासह चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधितांवर कडक कारवाई करण्याबरोबरच प्रसंगी मोक्का लावण्यासही मागेपुढे पाहिले जाणार नाही, असे घटनास्थळी भेट देणारे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी विजया, कुणाल व पंकज हे दोघे मुलगे, आई, वडील असा परिवार आहे.
मनमाड नजिकच्या पानेवाडी परिसरात सर्व प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांचे डेपो असून या भागातून राज्यात तसेच परराज्यातही बहुतांश भागात इंधन पुरवठा केला जातो. त्यामुळे पेट्रोल, डिझेल व घासलेट पुरवठय़ाच्या या केंद्राभोवतालचा परिसर भेसळखोरांचा अड्डा म्हणूनही परिचित आहे. हा परिसर मालेगाव महसूल मंडलाच्या अखत्यारित येतो. मंगळवारी, प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी दुपारच्या सुमारास मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे मनमाडहून नांदगावकडे निघाले असता परिसरातल्या जोंधळेवाडी येथे एका ढाब्यावर टँकर संशयास्पद अवस्थेत उभा असल्याचे त्यांना दिसले. इंधन भेसळीचा संशय आल्याने ते आपल्या शासकीय वाहनातून उतरून टँकरजवळ गेले असता काही जण टँकरमधून घासलेट काढताना दिसले. त्याला आक्षेप घेवून सोनवणे यांनी प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांनी त्यांच्याशी हुज्जत घालणे सुरु केले. एकंदर परिस्थिती पाहून सोनवणे यांनी आपल्या भ्रमणध्वनीद्वारे भेसळीचे चित्रण सुरु केले व त्याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते पाहताच भेसळखोरांपैकी दोघा-तिघांनी सोनवणे यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. सोनवणे यांच्यासमवेत असलेले त्यांचे स्वीय सहायक राजू काळे व चालक गवळी यांना देखील संबंधितांनी मारहाण सुरु केली. उभयतांनी तेथून स्वत:ची कशीबशी सुटका करुन घेतली व पळ काढला. तथापि, सोनवणे तेथेच कोसळले व घटनास्थळीच त्यांचा मृत्यू ओढवला. सोनवणे एवढे गंभीर भाजले होते की त्यांच्या मृतदेहाचा अक्षरश: कोसळा झाला. यावेळी झालेल्या झटापटीत प्रमुख संशयित पोपट शिंदे हा देखील भाजला असून त्याला मालेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर त्याला नाशिक येथे हलविण्यात आले आहे. शिंदे याच्यासह अन्य दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण शासकीय यंत्रणा हादरून गेली. वरिष्ठ पोलीस व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी फौजफाटय़ासह घटनास्थळी धाव घेतली. पाठोपाठ जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे त्यांचे पुत्र पंकज, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी नेतेमंडळींनी देखील तातडीने तेथे भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले असून प्रसंगी मोक्कांतर्गत कारवाईचा इशारा देखील दिला आहे. या घटनेनंतर लगेच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडून सोनवणे यांच्या येथील निवासस्थानी धाव घेतली. सोनवणे येथील द्वारका परिसरात वास्तव्यास होते. या घटनेची माहिती समजल्यानंतर आ. वसंत गीते यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेवून कुटुंबियांचे सांत्वन केले.

यशवंत सोनवणे यांचा परिचय
नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर हे सोनवणे यांचे मूळ गाव. तल्लख बुद्धिमत्ता आणि अविरत काम करण्याची तयारी ही यशवंत सोनवणे यांची खासियत. याच बुद्धिमत्तेच्या जोरावर १९८८ मध्ये मंत्रालय सहायक म्हणून ते प्रथम शासकीय सेवेत दाखल झाले. त्यापुढील वर्षी त्यांची लेखा विभागात वित्त अधिकारी म्हणून निवड झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १९९० मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली. अवघ्या तीन वर्षांत प्रत्येक परिक्षेत त्यांनी यशाची शिखरे अक्षरश: पादाक्रांत केली. नाशिक येथे परीविक्षाधीन सेवा बजावल्यानंतर त्यांनी कळवण व मालेगाव येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले. पुढे जळगावला भूसंपादन अधिकारी म्हणून काही काळ काम केल्यानंतर साधारणत: दोन वर्षांपूर्वी मालेगावच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर त्यांना बढती देण्यात आली. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत होते. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी विजया तसेच कुणाल व पंकज हे दोघे अनुक्रमे ११ वी आणि ९ वी इयत्तेतील मुलगे असा परिवार आहे.

सोनावणेंच्या कुटुंबियांना मदत
यशवंत सोनावणे यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना सोनावणे यांच्या निवृत्तीपर्यंतचे वेतनही देण्यात येणार असून घरातील एकाला नोकरीही देण्यात येणार आहे. तसेच सोनावणे यांच्या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्चही सरकारच्या वतीने करण्यात येणार असून त्यांना सरकारी सदनिकाही देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केले.

Link to original article - http://bit.ly/hj2hGQ

Saturday, January 15, 2011

आयपीएल : निष्ठा, प्रतिष्ठा की पैसा ?



आयपीएल : निष्ठा, प्रतिष्ठा की पैसा ?

निरनिराळ्या आयपीएल संघांकरिता खेळाडूंच्या खरेदीसाठी नुकताच जाहीर लिलाव करण्यात आला. या लिलावात अनेक नवोदित खेळाडूंवर कोटी-कोटींची बोली लावण्यात आली. ही खरेदी नेमकी कोणत्या निकषांवर होते, हे अजून अज्ञात आहे. हे असेच चालले तर एके दिवशी आयसीसी आणि भारतीय क्रिकेट बोर्डालाही डावलून हा खेळ संघमालक आपल्या खिशात घालतील, अशी लक्षणे आहेत. त्यामुळेच आयपीएलसंदर्भात सर्वसामान्यांच्या मनात अनेकानेक प्रश्न उपस्थित होत आहेत.. ‘आयपीएल ४’चा लिलाव ललित मोदींशिवाय संपला. ललित मोदी कार्यरत असताना मिळालेल्या प्रतिसादापेक्षाही मोठा प्रतिसाद यावेळी मिळाला. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग यांना मिळालेल्या रकमेपेक्षाही अधिक रक्कम गंभीर, युसूफ पठाण, रॉबिन उत्थप्पा, रोहित शर्मा, इरफान पठाण, युवराजसिंग, एवढेच नव्हे तर रणजी सामन्यातही आपला ठसा न उमटविणाऱ्या सौरभ तिवारीला मिळाली. गुरंढोरं विक्रीच्या बाजाराप्रमाणे क्रिकेट-विक्रीच्या या बाजाराच्या थेट प्रक्षेपणाचेही यावेळी मार्केटिंग झाले. आयपीएल हे आता केवळ क्रिकेट उरलेले नाही. आयपीएल हा मोठा उद्योगधंदा बनला आहे. २०११ च्या या लिलावाचे स्वरूप पाहिले तर उद्योगाच्याही पलीकडे हे क्रिकेट चालले आहे, याची जाणीव होते. ती एक प्रवृत्ती बनत चालली आहे. उद्योगजगतातल्या अंबानी, मल्ल्या, वाडिया, सहारा यांच्यासारखे दादा लोक आयपीएल क्रिकेट बोर्डाच्या दावणीतून कधी सुटका होऊन ते मोकाट सुटतील, हे यापुढे कुणालाही सांगता येणार नाही.
उद्योगपतींच्या मुजोर प्रवृत्तीचे दर्शन आयपीएलने अधूनमधून घडविले आहेच. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावा, सर्वोच्च शतके झळकविणारा सचिन तेंडुलकर मोठा की काल-परवा आलेले, कसोटी क्रिकेटचा टिळाही न लागलेले रोहित शर्मा, सौरभ तिवारी हे मोठे, हे यापुढे मल्ल्या, अंबानी, सहारा, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, गायत्री राव हीच मंडळी ठरवणार आहेत. गौतम गंभीरची लिलावातील किंमत ११.४ कोटी रुपये कशाच्या आधारे ठरविण्यात आली, याचे उत्तर सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे. रॉबिन उत्थप्पा गेले कित्येक महिने भारतीय संघात समाविष्ट होऊ शकलेला नाही. पण त्याला लिलावात आलेला भाव आहे- ९.६६ कोटी एवढा प्रचंड. सौरभ तिवारी, इरफान पठाण यांनी तर यंदा रणजी स्पर्धाही गाजविल्या नाहीत, पण त्यांच्या खिशातही आठ व सहा कोटींपेक्षा अधिक पैसे पडले आहेत. इरफान पठाण तर वर्षभर बडोदे क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावरदेखील फिरकला नाही. कारण तो क्रिकेट खेळण्याइतपत तंदुरुस्तच नाही. सध्या तो बंगळुरूमध्ये फिटनेससाठी धडपडतोय. पण अशा खेळाडूसाठीही आठ कोटी ८७ लाखांपर्यंतची बोली लागली.
सारेच अनाकलनीय आहे! शेअर मार्केटवर नियंत्रण करणारी आणि ते हलविण्याची क्षमता असलेली ही मंडळी क्रिकेट कोणत्या थराला घेऊन जाणार आहेत, याचीच ही झलक आहे. आयपीएल ही उद्योजकांना सापडलेली पैसे कमावण्याची खाण आहे. या खाणीतून पैसा काढताना क्रिकेटची नीतीमूल्ये पायदळी तुडवण्यास सुरुवात झाली आहे. ललित मोदींच्या पश्चातदेखील या स्पर्धेला प्रचंड पुरस्कर्ते लाभले आहेत. प्रचंड पैसा तीत आला आहे. प्रेक्षकांचा पाठिंबाही प्रचंड आहे. अशा परिस्थितीत कसोटी क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट, एवढेच नव्हे तर आयसीसीच्या स्वत:च्या असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा, ट्वेन्टी-२० वर्ल्ड कप आदी स्पर्धानादेखील आयपीएल यापुढे झाकोळून टाकू शकेल, अशी शक्यता आतापासूनच दिसायला लागली आहे.
हे आयपीएल आयसीसीच्या अस्तित्वालाच उद्या आव्हान देऊ शकेल. कारण त्यांना कुणाचीही बंधने नको आहेत. स्वत:चा स्वतंत्र कार्यक्रम त्यांना राबवायचा आहे. भारतीय संघ नसला तरीही ‘ट्वेन्टी-२०’ क्रिकेटला प्रेक्षक मोठय़ा प्रमाणावर येतात, हे फ्रॅन्चायझींच्या मालकांना कळून चुकले आहे. त्यामुळेच हा आगामी धोका ओळखून भारतीय क्रिकेट बोर्डाने संघमालकांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. खेळाडूंचे गेल्या दोन वर्षांचे मानधन न देणाऱ्या पंजाब संघाचा नफ्यातील सर्व हिस्सा क्रिकेट बोर्डाने अडकवून ठेवला होता. असे नाक दाबल्यामुळेच त्या संघाचे तोंड उघडले. युवराजसिंग, इरफान पठाण, कुमार संगकारा आदी खेळाडूंना थकित मानधन मिळाले.
ललित मोदी यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या काही फ्रॅन्चायझींनाही क्रिकेट बोर्डाने मागे सरळ केले होते. पण तांत्रिक बाबींपुरतीच ही लढाई मर्यादित होती. आयपीएल किंवा ट्वेन्टी-२० मुळे होणारे क्रिकेटचे नुकसान आयसीसी किंवा भारतीय क्रिकेट बोर्डालाही आता रोखता येणार नाही. कारण प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी यापुढे क्रिकेटचे अधिकाधिक विकृत स्वरूपात विडंबन केले जाण्याची शक्यता आहे. ललित मोदी यांनी ‘चीअरगर्ल्स’च्या नावाखाली आंबटशौकिनांची अपेक्षा वाढविली आहेच. फलंदाजाने मारलेल्या चौकार-षटकारापेक्षाही त्यानंतर नाचणाऱ्या या क्रिकेट-बालांचे तोकडय़ा कपडय़ांमधील नृत्य पाहण्यासाठीचा उत्साहच अधिक असते. प्रत्येक वेळी आयपीएल अशा नवनव्या कल्पना घेऊन अवतरणार आहे. दोन डावांच्या मधील वेळेचा बॉलीवूड स्टार्सच्या नृत्यांसाठी वापर करण्याचीही कल्पना आहे. गुलामांप्रमाणे बोली लावून विकत घेतलेल्या या क्रिकेटपटूंना वागणूकही तशीच देण्यात येत आहे. साडेतीन तास संघर्षमय क्रिकेट खेळून थकल्या-भागल्या खेळाडूंना मध्यरात्रीच्या पार्टीला हजेरी लावणे सक्तीचे आहे. मागे एकदा भारताच्या दोन माजी कप्तानांनी थट्टेने म्हटले होते की, ‘सामना पाहतानाही काही महागडय़ा स्टॅण्ड्समध्ये आम्हाला व राखीव खेळाडूंना बसविण्याची आग्रही विनंती होती. हे मालक लोक आणखी जास्त पैसे मिळतात म्हणून आमच्या मांडीवर बसून सामना दाखविण्याची शक्कलही लढवू शकतील.’ यातील अतिशयोक्तीचा आणि विनोदाचा भाग सोडला, तरीही भारताचे दोन माजी कप्तान आपल्या संघमालकांची मजल कुठवर जाऊ शकते, याबद्दल काय विचार करतात, हेच यातून स्पष्ट होते.
आयपीएलमधील आणखी एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. ते म्हणजे- खेळाडूंची किंमत ठरविण्याची पद्धत! ती कोण ठरवतो, तेही गुलदस्त्यातच आहे. तीन वर्षांपूर्वीच्या लिलावामध्ये बहुतांशी खेळाडूंना विकत घेताना संघमालक व त्यांचे भागीदार यांचाच प्रभाव जास्त जाणवत होता. त्यांनी मोठमोठी नावे असलेले खेळाडू घेण्यासाठी उडय़ा टाकल्या होत्या. तीन वर्षांनंतर हे मालक शहाणे झालेले दिसताहेत. यावेळी मोठय़ा खेळाडूंच्या मागे न धावता त्यांनी खेळाडूंच्या उपयुक्ततेचादेखील विचार केलेला दिसत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे यावेळी त्यांनी आपल्या ताफ्यातील क्रिकेट जाणकारांचा सल्ला विचारात घेतला आहे. प्रत्येक संघाकडे कर्मचारीवर्गही मोठा आहे. पडद्याआडचे हे कलाकार आपल्याला दिसत नाहीत. पण आयपीएल फ्रॅन्चायझी एखाद्या कंपनीप्रमाणे संघाचा स्वतंत्र कारभार पाहतात. प्रमुख प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक, गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षण यासाठी वेगवेगळे मार्गदर्शक, खेळाडूंचा फिझिओ वेगळा, ट्रेनर वेगळा, मॅनेजर वेगळा, ग्राऊंड स्टाफ वेगळा. प्रत्येक संघाचा सीईओ असतो. तो क्रिकेट मैदानावरची आणि मैदानाबाहेरची व्यवस्थाही पाहत असतो. त्याला वेगवेगळ्या विभागांची कामे करण्यासाठी सहाय्यक असतात. स्टेडियमवरील व्यवस्था पाहणे, आपल्या संघाची नेटस् लावणे, सरावाची व्यवस्था पाहणे, खेळपट्टी कशी असावी आणि त्यानुसार ती करून घेणे, याकडेही त्याला लक्ष द्यावे लागते. त्यासाठी क्युरेटरची स्वतंत्रपणे नेमणूक करण्यात येते. दुसरा विभाग स्टेडियमवरील जाहिरातींकडे लक्ष पुरवीत असतो. त्या जाहिराती, पुरस्कर्ते आणणारे लोक वेगळे असतात. एक विभाग तिकीट विक्री, तिकिटांचे दर ठरवणे, ती छापून घेणे, पुरस्कर्ते व सर्वसंबंधितांपर्यंत पोहोचविणे हे काम पाहत असतो. प्रत्येकाचे पुरस्कर्ते वेगवेगळे असतात. त्यांना जपणारा विभाग वेगळा असतो. प्रत्येक संघाला आपल्या संघातील दिग्गज खेळाडूंचे मार्केटिंगही करायचे असते. त्यासाठी जाहिरातदार मिळविणे, स्वत:च्या ब्रॅण्डच्या जाहिराती करणे, यावर त्यांना काम करावे लागते. एक विभाग असा असतो की, जो सामन्याच्या पाश्र्वभूमीवर आणखी पैसे कसे कमावता येतील, याची योजना आखत असतो. अंतिम सामन्यानंतर किंवा प्रत्येक सामन्यानंतरची मेजवानी हा त्याचाच एक भाग आहे. धनाढय़ क्रिकेटशौकिन अशा डिनर पाटर्य़ावर लाखो रुपये उडवतात. त्या पाटर्य़ाना आकर्षित करण्याचे काम एक विभाग करीत असतो. आवडत्या खेळाडूसोबत डिनर घ्यायला मिळणे, या आनंदासाठी लाखो रुपये मोजणारे एकीकडे असतात; तर दुसरीकडे नाइलाजाने, बळेबळे या डिनर पार्टीला हजेरी लावणारे खेळाडू असतात. मागे अनेकांनी अशा पाटर्य़ाना जाणे टाळले होते आणि आपल्या संघमालकांचा रोष पत्करला होता.
सुमारे दीड महिना चालणाऱ्या या आयपीएल उद्योगामागे प्रत्येक संघाचा सुमारे १०० ते ३०० जणांचा कर्मचारीवर्ग राबत असतो.
आयपीएल गेट मनी हादेखील खेळाडूंच्या लिलावातील किमतीप्रमाणेच न कळणारा प्रकार आहे. कारण सर्वसामान्य प्रेक्षकांना ही तिकिटे मिळत नाहीत. स्टेडियमवर तिकिटे विकली जात नाहीत. पुरस्कर्ते आणि कॉर्पोरेट मित्रांमार्फतच या तिकिटांचे वाटप, वितरण होत असते. त्यामुळे तेथे पहुंॅच असणाऱ्यांनाच तिकिटे मिळतात. आणि टंचाई भासली की मागणी वाढते, या न्यायाने तिकिटांच्या किमती वाढत जातात. कधी कधी तिकिटे संपल्याचे सांगण्यात येते, परंतु स्टेडियममधील स्टॅण्ड्स रिकामेच असतात. आयपीएलचा आभास हा असा आहे!
सचिन तेंडुलकरची किंमत त्याने निवडलेल्या खेळाडूंपेक्षा कमी असू शकते का? जॅक कॅलिस, ग्रॅमी स्मिथ, केव्हिन पीटरसन यांच्या किमती रणजी खेळाडूंपेक्षा कमी असू शकतात, हा विचारदेखील पटत नाही. खेळाडूंना मिळणारी रक्कम त्यांच्या खेळाच्या दर्जाच्या योग्यतेनुसार आहे, त्यांच्या प्रतिभेला अनुसरून आहे, की संघमालकांच्या चाणक्यांनी ठरविलेल्या निकषानुसार आहे? आयपीएलच्या अनपेक्षित यशाप्रमाणेच या प्रश्नांची उत्तरेदेखील अज्ञातच आहेत.
आता अन्य खेळाडूंना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. ३० लाख वार्षिक किंमत निश्चित केलेल्या अंबाती रायडूला त्यापेक्षा तिप्पट पैसे देऊन घेण्याची तयारी मुंबई इंडियन्सने दाखविली होती. आता मुंबईकडून आठ आकडी पैसे मोजून त्याला घेण्यासाठी बंगळुरू संघ पुढे सरसावला आहे. अशाने खेळाडूंची निष्ठा नेमकी कुठे राहील? पैशाप्रती की त्याच्या राज्याच्या संघाप्रती? कारण मुंबईसह कुणीही आपापल्या खेळाडूंना मोठय़ा प्रमाणावर घेण्यात रस दाखवलेला नाही. अगदी आपल्या तेंडुलकरनेदेखील!

Link to original Article
http://bit.ly/dEKxCN

Sunday, January 2, 2011

माणसाच्या अस्तित्वाचे रुपांतर आठवणींमध्ये होते


बादशहाच्या अब्बाजानचा इंतकाल झाला. त्यांचं वय झालं होतं आणि अनेक व्याधींनी त्यांना घेरलं होतं. वेदनांमधून त्यांची सुटका झाली, मृत्यूनं त्यांना जवळ केलं. बादशहाचा महाल शोकसागरात बुडाला. बादशहानं अन्नपाणी सोडलं आणि तिसऱ्या दिवशी स्वत:ला एका कक्षात कोंडून घेतलं. बेगम संचित झाल्या, मंत्रिमंडळ काळजीत पडलं, प्रजा भयभीत झाली. बिरबलानं सर्वाना धीर दिला आणि तात्पुरती राज्याची सूत्रं स्वत:कडे घेतली. बादशहाच्या दु:खाची तीव्रता कमी होऊन तो स्वत:च बाहेर येईल यासाठी चार दिवस वाट पाहिली; परंतु बादशहा दु:खाच्या आवर्तनातून बाहेर येण्याचे चिन्ह दिसत नव्हते. अखेर बिरबलाने एका कागदावर बादशहाला पत्र लिहिले. ‘खाविंद, आपले दु:ख आम्ही समजू शकतो, परंतु आपण बादशहा आहात, लाखोंचे पोषिंदे आहात याचा विसर पडू देऊ नका. एखादी व्यक्ती, एखादी वस्तू जाते, म्हणजे ती पूर्णपणे जात नाही, तिचे फक्त रुप बदलते, अस्तित्व संपत नाही. तेव्हा अब्बाजानचा इंतकाल म्हणजे त्यांचा अंत, असे समजू नका.’

बिरबलाचे पत्र वाचून बादशहाने आपले दु:ख आवरते घेतले आणि तो बाहेर आला. राज्याचा गाडा पूर्ववत सुरू झाला. काही दिवस गेले. बादशहा आणि बिरबल एका संध्याकाळी मावळता सूर्य पाहत बसलेले होते, तेव्हा बादशहाने बिरबलाच्या पत्राचा विषय काढला आणि म्हणाला, ‘माणूस संपला की सगळे संपतेच रे बिरबल!’ बिरबल छान हसला आणि म्हणाला, ‘माफी असावी खाविंद, कुठलीच गोष्ट संपत नाही. इथे सूर्य मावळताना दिसतो तेव्हा तो कुठेतरी उगवत असतो. लाकूड जळून कोळसा होतो. कोळसा जळून राख होते. पाणी वाहून जाते ते कुठेतरी जातच असते. वस्तूचे फक्त रुप, आकार, रंग, अवस्था बदलत असतात!’ बिरबलाकडे रोखून पाहात बादशहा म्हणाल, ‘आणि मनुष्याचे काय उरते?’
बादशहाचे दोन्ही हात आपल्या हाती घेत बिरबल हळव्या स्वरात म्हणाला, ‘माणसाच्या अस्तित्वाचे रुपांतर आठवणींमध्ये होते खाविंद! अब्बाजान तुमच्या आठवणींमधून कधी पुसले जाणार आहेत का?’ बादशहानं आंसूभरल्या डोळ्यांनी बिरबलाला मिठीत घेतलं आणि त्याचं अस्तित्व महसूस केलं. त्यांच्या मिठीतून बाहेर येत बिरबल म्हणाला, ‘मीही गेलो तर असाच शिल्लक राहीन, तुमच्या स्मृतिंमध्ये!’ बादशहा अकबर कातर स्वरात म्हणाला, ‘खबरदार, असं काही बोललास तर!’ पायात आपले बूट चढवत बिरबल म्हणाला, काळजी करू नका, तुम्ही गेल्यावर तुमच्याही आठवणी राहतील, निसर्गाचे नियम सगळ्यांना सारखेच लागू होतात!’ वास्तवाच्या जाणिवेनं येणारी एक अनोखी उदासी बादशहाच्या चेहऱ्यावर दाटून आली! बिरबल निघून गेला.
धन्यवाद लोकसत्ता ... ....    Link to original article

Monday, November 15, 2010

कफन को जेब नही होती और मौत रिश्वत नहीं लेती





मुंबईत सातरस्त्याजवळ ऑर्थर रोडला लागून एक छोटेसे दुकान आहे ‘प्रीती आर्ट्‍अस’ नावाच्या या दुकानात सुंदर मूर्ती, चित्र, शोपीस व स्टीलचे फर्निचर मिळते. पण आश्चर्य असे की, हे दुकान कधी चालू तर कधी बंद असते. शेजारच्या पानवाला सांगतो, ग्राहक दुकानाबाहेर उभे राहतात दुकान उघडण्याची वाट पाहत, पण मालक मात्र आपल्या मर्जीने येतो आणि जातो. याचे कारण या दुकानाच्या मालकाचे एक वेगळेच वेड.

मुंबईसारख्या ‘फास्ट लाइफ’ ने झपाटलेल्या जीवनात जिथे जिवंत माणसांसाठी वेळ काढता येत नाही तिथे किशोरचंद्र भट आपला कामधंदा बाजूला ठेवून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईतील वेगवेगळी स्मशाने पालथी घालत असतात. आपल्या दुकानात बसून ते फक्त कामाचेच फोन न घेता शवगृहांचे, इस्पितळांचे व पोलीस ठाण्याचेही फोन सतत घेत असतात. हेच लोक त्यांना बेवारशी शवांची माहिती देऊन बोलावून घेतात. १९६८ पासून त्यांनी हे कार्य सुरू केले. त्याच वर्षी सुरतमध्ये पूर आला होता. खाद्यवाटप करणाऱ्या एका संस्थेसोबत १७ वर्षीय किशोर भटही गेले होते. माणसं आणि जनावरांना एकत्र मरून पडलेले पाहून त्यांना खूप अस्वस्थ वाटले. शेवटी थाटात आणि तोऱ्यात जगणाऱ्यांचीही मातीच होते हे त्यांच्या वडिलांनी त्यांना समजावले व तेव्हाच सुरू झाली त्यांची मृत्यूशी मैत्री. विविध इस्पितळांमध्ये जाऊन त्यांनी सांगितले की, ‘बेवारस मृतदेह मिळाले तर मला कळवा’ हे ऐकून अनेकांना संशय वाटायचा. सुरुवातीला तर हा मृतदेहांवरील गोष्ती चोरत असेल अशी शंकाही व्यक्त करण्यात आली, पण सत्य व चांगल्या हेतूला पुरावे लागत नाहीत. किशोर यांनी आपल्या निःस्वार्थ कार्याने हे सिद्ध केले आहे. आजपर्यंत त्यांनी जवळ जवळ २६०० बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. १९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा किशोर यांनी अनेकांची मदत केली. देहाच्या चिंध्या बॅगेत भरून त्यांना अग्नी दिल्याचे त्यांना आठवते. यावर ते म्हणतात, मृत्यू हा कधीही आणि कुठेही येऊ शकतो. पैशांसाठी धावणारे व साम्राज्याचे कर्तेदेखील मृत्यूपुढे भिकारीच असतात. मृत्यूबद्दल सर्वात महत्त्वाचे काही सांगायचे झाले तर तुम्ही काय सांगाल? हा प्रश्न तसा साधारणच होता. पण त्यांच्या असाधारण उत्तराने मला थक्क केले, ‘कफन को जेब नही होती और मौत रिश्वत नहीं लेती.’ हे ऐकून अंगावर काटा आला, पण त्यांच्यासाठी हा आयुष्याचाच एक भाग आहे. त्यांच्या दुकानात कापडचे तागे, अगरबत्ती, गंगाजळ, मडके... सर्व काही एका कोपऱ्यात ठेवले आहे. कापडाचे चार मीटरचे तुकडेदेखील वेगळे काढले आहेत. म्हणजे तातडीने जावे लागले तर आयत्या वेळी त्रास नको. याच कपड्याच्या तुकड्यांनी शव बांधले जातात. बोलावणे आले की, भट हे तुकडे घेऊन पोहोचतात. म्हणूनच त्यांना ‘चार मीटर कपडावाला’ असे ओळखले जाते. हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन .... कोणत्याही जातीची व्यक्ती असली तरी भट त्यांना शेवटचा विधी संपन्न करून देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. हिंदूना संपूर्ण विधीप्रमाणे जाळले जाते. मुसलमानांना त्यांच्या शास्त्रांचे पालन करून पुरले जाते व मृत व्यक्तीच्या जातीचा मन ठेवनूच अंत्यसंस्कार केले जातात. ‘रद्गती’ नावाचा त्यांचा एक ट्रस्ट त्यांनी बनवला. ‘डोनेशन घेण्यासाठी हा ट्रस्ट नाही स्थापन केला मी. माझ्यानंतर हे कार्य सुरू राहावे व लोकांनी यात सहभाग घ्यावा हाच या स्थापनेचा हेतू आहे’ असे ते सांगतात. दुकानाबाहेर दोन व्हॅन सतत उभ्या असतात. फुकट शव नेण्याची सुविधा हा ट्रस्ट सामान्य माणसांसाठी देतो व मयताचे सारे सामानही फुकट वाटले जाते. सर्व इस्पितळे आता किशोर भट यांना ओळखतात. काही गरीबांकडे उपचारांवर खर्च झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे उरत नाहीत. अशा वेळी किशोरजींचा नंबर दिला जातो. अशीच एक घटना त्यांनी सांगितली. एका बाईची छोटी पोर नायर हॉस्पिटलमध्ये आजाराने मेली. मेलेल्या मुलीला ती सोडून चालली होती. कारण स्मशानाचा व अंत्यसंस्कारांचा खर्च तिला परवडणारा नव्हता. ‘देव नाही!’ असे म्हणून ती रडत रडत बाहेर पडत होती. तेवढ्यात किशोरजी तिथे पोहोचले. तिला थांबवून ते म्हणाले, ‘मी सर्व करीन. मला देवाने पाठवले आहे.’ त्या आईचे काळीज भरून आले असेल आणि कदाचित देवाचीही तीच अवस्था असेल. खंर तर हे कार्य म्हणजे चांगलेपणाचा व देवावरच्या विश्वासाचाच प्रचार आहे, असे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडत असतात. एकदा तर त्यांच्या दुकानाबाहेर झाडाखाली एक माणूस पडला होता. विचारपूस केल्यावर ‘मला टीबी आहे. दूर जा’, असे तो म्हणाला. किशोरजींनी त्याला टाटा इस्पितळात दाखल केले व त्याचा संपूर्ण खर्च करीत होते. एका आठवड्यात हा माणूस टॅक्सीने दुकानासमोर आला. किशोरजींना टॅक्सीचे पैसे द्यायला सांगितले. ‘मला वेळ नाही. तुम्ही माझ्यासाठी खूप केले, धन्यवाद’ असे म्हणून तो कोसळला. फक्त त्यांना भेटण्याकरिता त्या माणसाने श्वास धरून ठेवला होता. माझ्यावर लोक असेच प्रेम करतात, हे सांगून त्यांनी हा किस्सा बंद केला. अनेकांचे आशीर्वाद आणि देवाची कृपा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. त्यांच्या दुकानात पाच मिनिटे बसलात तरी प्रसन्न वाटते. लोक मृत्यू, त्रास आणि जनसेवेपासून पळतात हे त्यांना फारसे आवडत नाही.गेल्या वर्षी एका इस्पितळातील सहा एड्सचे रुग्ण मेले. किशोरजींनी शिवडीतील स्मशानात त्यांचे अंत्यसंस्कार केले. तेथील एकाने त्यांना सहानुभूती देण्याकरिता म्हटले, मी मदत करायला येत होतो. आपले संबंधी होते का मृत? किशोरजींनी ‘ ते एड्सचे पेशंट होते’ सांगितल्या क्षणी, ‘बरं झालं, मी नाही आलो’ असे म्हणाला. हे ऐकून किशोरजींना दुःख झाले. माणूसच माणसाचा सर्वात मोठा शत्रू असल्यासारखा वागतो कधी कधी, असे म्हणाला. हे ऐकून किशोरजईंना दुःख झाले. माणूसच माणसाचा सर्वात मोठा शत्रू असल्यासारखा वागतो कधीकधी, असे ते म्हणतात. मुंडके नसलेल्या, किडे पडलेल्या, तुकडे झालेल्या, झडलेल्या, जळालेल्या विचित्र परिस्थितीतल्या शवांना हात लावून, त्यांचे विधी व संस्कार करूनही त्यांना कधी घाण नाही वाटली किंवा कोणता रोग नाही झाला. ते या ढोंगी समाजातील कुचकट भीतीचा व कुटील विचारांचा निषेध करतात. त्यांच्यासाठी सगळे एकच आहे. हल्लीच ताजमधील प्रकरणांत मेलेले १८ शव कस्तुरबा इस्पितळात आणले गेले. किशोरजींना फोन करून बोलावले गेले. ‘सतरांनाच कापड बांधा’ हा आदेश ऐकून त्यांनी ‘का?’ असे विचारले. ‘तो एक आतंकवादी होता. आता तो फक्त एक मृतदेह आहे.’ सर्व इस्पितळांचे व पोलिसांचे लाडके किशोर भट फारच आनंदी व्यक्ती आहेत. ‘सर्व संस्कार केलेले आत्मे माझी काळजी घेतात’ हे त्यांचे म्हणणे आहे. या पिढीला आत्मे आणि संस्कार हे शब्द जरी जरा जड वाटले तरी एक मात्र शिकण्यासारखे आहे, चांगल्यावर विश्वास ठेवा, चांगले करा आणि चांगलेच शोधा, म्हणजे सापडेल. खरं तर हा ‘चार मीटर कपडावाला’ आठवड्याचा माणूस नसून आयुष्याचाच माणूस आहे. दुकानातील शंकराची थ्रीडी मूर्ती आणि किशोरभाईची कीर्ती प्रत्यक्षच पाहायला हवी. जमल्यास नक्की पहा.
किशोर भट २३०८७९७६, २३०९७९७४