मराठी पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी - All क्रेडीट goes to respective writer
Wednesday, January 20, 2010
लोकशाहीची यंत्रणा चालायला हवी ना? आपल्यापुढं जे पर्याय आहेत त्यातून एक निवडायचा आणि अधिक चांगल्या पर्यायाची वाट पाहायची!
Tuesday, January 19, 2010
इतिहासातील चुकांमधून वर्तमानाने धडा घ्यायचा तर इतिहास जसाच्या तसा लिहिला जाणं आवश्यक नाही का?
बिरबल म्हणाला, ‘खाविंद, पुढं भविष्यात तुमचा एखादा खापर पणतू खोटा इतिहास लिहिल, त्यापेक्षा आपण आताच त्याची व्यवस्था केलेली बरी!’
अर्थात बादशहा हे ऐकून वरमला. त्याची ती स्थिती पाहून बिरबल म्हणाला, ‘खाविंद, राज्यकर्त्यांमध्ये आणि समाजाच्या नेतृत्वामध्येच जर इतिहास पचवण्याची ताकद नसेल तर समाजात ती कुठून येणार? आणि इतिहासातील चुकांमधून वर्तमानाने धडा घ्यायचा तर इतिहास जसाच्या तसा लिहिला जाणं आवश्यक नाही का?’ बादशहा हे ऐकून खिन्न झाला, कारण त्याची विवेकबुद्धी शाबूत होती.
Tuesday, January 12, 2010
समाजाला लांच्छनास्पद असलेल्या गोष्टी जगाला सांगणं, उजेडात आणणं हे कोणत्याही कलेचं एक महत्त्वाचं काम आहे
Sunday, January 3, 2010
तो तरुण खरं तर तुमच्या हिताचं सांगत होता, परंतु तुमची मन:स्थिती ठीक नसल्यानं तुमचा तोल गेला खाविंद!
बादशाह आणि बिरबल शेजारच्या राज्यातली वृत्तपत्रं उत्सुकतेनं चाळत बसले होते. त्या देशातल्या एका सभ्य व्यक्तीनं ‘विरोधी पक्ष अस्थीर असणं बरं नव्हे’ असं म्हटलं तर त्याला ‘तुम्ही तुमचं बघा, आमचं आम्ही बघून घेऊ असं’ उत्तर विरोधकांनी दिलं. ते वाचनू बादशहा म्हणाला,‘अरे ही माणसं चांगल्या मनानं सांगितलंले सुद्धा ऐकून का घेत नाहीत? ’ आपल्या हिताची गोष्टही ऐकून घ्यावीशी वाटत नाही’ बादशहाला काही ते पटलं नाही. दोघांमध्ये बराच वेळ ह्यावर वाद सुरू होता. दुसऱ्या दिवशी सकाळी बादशहा आणि बिरबल घोडय़ांवरून रपेट मारायला जाणार होते. परंतु बादशहाचा आवडता घोडा आजारी आहे असं पार्टीच्या प्रमुखानं सांगितलं. बादशहाचा मूड गेला. तो बिरबलाला म्हणाला, ‘आज माझा अंगरखाही नीट बसलेला नाही आणि घोडा आजारी आहे. आपण पयीच फिरायला जाऊया.’ दोघे फिरायला निघाले. बिरबल बादशहाला म्हणाला,‘पायीच जायचं आहे तर मग नेहमीपेक्षा वेगळ्या रस्त्यानं जाऊया!’ दोघेही निघाले. थोडं चालून गेल्यावर बादश्हा म्हणाला,‘हा रस्ता दुरूस्त करण्यासाठी ह्यावर्षी आपण निधी मंजूर केला होता ना?’ बिरबल म्हणाला,‘होय खाविंद, रस्ता बहुतेक नीट दुरूस्त केला नसणार. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा उखडला.’ थोडं पुढे एका इमारतीचं काम अध्र्यावरच बंद पडून शेवाळ धरलं होतं. ‘हे असं बंद का पडलंय?’ बादशहानं विचारलं. ‘माफी असावी खाविंद. आपले अधिकारी पैसे खाऊन बांधकामांना परवानगी देतात आणि मग त्याच व्यवहारात कमी जास्त झालं की काम बंद पाडतात.’ बिरबल म्हणाला. हे ऐकून बादशहाचा मूड अधिकच खराब झाला. भरीस भर म्हणून चालता चालता बादशहाच्या चपलेचा अंगठा तुटला. कसा तरी लंगडत, अडखळत बादशहा परतीच्या वाटेला निघाला. त्याला असं चालताना पाहून एक तरूण थांबला. त्यानं आपली पादत्राणं काढली आणि बादशहाला म्हणाला,‘हुजूर, आपण माझी पादत्राणं घालून जा. आपली चप्पल दुरूस्त करून मी राजवाडय़ावर आणून देतो.’ त्याचं ते बोलणं ऐकून बादशहाचं पित्त खवळलं आणि तो म्हणाला,‘तू एवढा क्षुल्लक नागरिक आणि तुझी ही हिम्मत? तुझी पादत्राणे बादशहाला घालायला देतोस़? अपमान करतोस माझा?’ तो तरुण भीतीने चळचळा कापू लागला. बिरबलानं त्याला जायला सांगितलं आणि बादशहाला म्हणाला,‘तो तरुण खरं तर तुमच्या हिताचं सांगत होता, परंतु तुमची मन:स्थिती ठीक नसल्यानं तुमचा तोल गेला खाविंद!’ त्या तशा अवस्थेतही बादशहाला हसू फुटलं. त्यानं त्या तरुणाला बोलावलं, त्याची पादत्राणं घातली आणि बिरबलाला म्हणाला,‘झाला का मला धडा शिकवून? चल आता, चहाची तलफ आली आहे जोरदार!’
Subscribe to:
Posts (Atom)