राज्याची प्रजा राजाच्या कारभारावर नाराज होती. तिच्या मनात खूप तक्रारी होत्या. त्यामुळे एक दिवस राजाच्या विरुद्ध मोर्चा काढण्यासाठी प्रजा रस्त्यावर उतरली. ही गोष्ट प्रधानाच्या कानावर गेली.
त्याने फर्मान सोडले की, जशी गरज असेल तसे पाऊल उचला, पण कसेही करून हा मोर्चा, हा उद्धटपणा थांबवा.
मोर्चा निघाला पण लवकरच तो गोळीबार, लाठीमार करून अडवला गेला. ज्याने बरेच लोक घायाळ झाले. इकडे तिकडे पांगले गेले. मोर्चाच्या नेत्यांना अटक केली गेली. शहरात दहशत पसरली.
काही काळानंतर प्रधानाच्या हुकूमानुसार शहरात बरीच चांगली कामे होऊ लागली, धान्य स्वस्त झालं, नवीन कारखाने उघडले गेले, रस्ते बनवले गेले. हे सगळं बघून एका सभ्य माणसाने प्रधानाला विचारलं, ‘‘तुम्ही तर कमाल करत आहात, काल तुम्ही ह्य़ा शहरातील लोकांवर गोळ्या झाडून त्यांना मारून टाकत होता आणि आज त्याच शहरातील लोकांच्या सुखासाठी, प्रगतीसाठी प्रयत्न करत आहात?
हुशार प्रधानाने उत्तर दिलं, मी मांजरीकडून एक धडा शिकलोय, तिने जर एखाद्या चांगल्या जागेवर घाण केली तर त्यावर ती लगेचच माती पसरून देते.
वाईट कामांना नेहमी चांगल्या कामांनी झाकलं पाहिजे. कारण निवडणुका येईपर्यंत लोक आम्ही केलेले वाईट काम विसरून जातील आणि आमची चांगली कामंच लक्षात ठेवतील.
मराठी पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी - All क्रेडीट goes to respective writer
Showing posts with label lokshahi. Show all posts
Showing posts with label lokshahi. Show all posts
Sunday, March 21, 2010
Sunday, March 7, 2010
अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी विरोधकांकडून लेखी सूचना मागवा, म्हणजे त्यांना निव्वळ विरोधकाच्या भूमिकेतून बाहेर पडावे लागेल!
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारल्या तेव्हा सत्ताधाऱ्यांनी तो उत्तम आहे असं सांगितलं तर विरोधकांनी त्यातील दरवाढीचा निषेध केला. काही गट जे बादशहासोबत सत्तेत भागीदार होते त्यांच्या प्रदेशात निवडणुका होऊ घातल्या होत्या त्यांनीही भाववाढीला विरोध केला.
त्याच रात्री बादशहानं बिरबलाला विचारमंथनासाठी बोलावलं. बादशहाची नाराजी बिरबलाच्या नजरेनं टिपली होती; त्यामुळं त्याला अंदाज आला होता. बिरबल आल्यावर थोडावेळ राज्याच्या दैनंदिन कामांची चर्चा झाली आणि मग बादशहानं आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. ती ऐकून बिरबल हसला आणि म्हणाला, ‘हा त्या विरोधकांचा दोष नव्हे, आपल्या संसदीय संकल्पनांचा दोष होय.’ बादशहाला त्याचा अर्थ कळला नाही तेव्हा बिरबल अधिक स्पष्ट करत म्हणाला, ‘खाविंद आपण लोकप्रतिनिधींची विभागणी ‘सत्ताधारी आणि विरोधक’ अशी करतो. एकदा विरोधक म्हटलं की त्यानं प्रत्येक गोष्टीला विरोध करणं ओघानं आलंच. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच विरोधकांची त्यावरील प्रतिक्रिया ठरलेली असते, मग तो त्यांनी ऐकला काय आणि न ऐकला काय याने काय फरक पडतो?’ बादशहा ऐकून विचारात पडला त्याची ही मन:स्थिती हेरून बिरबल पुढे म्हणाला, ‘सत्ताधारी आणि सत्तेवर नसलेले’ अशी खरं तर विभागणी व्हायला पाहिजे. ‘यावर उपाय काय?’ बादशहानं कळीचा प्रश्न विचारला. बिरबल म्हणाला, ‘आहे ना. पुढच्या वर्षी अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी विरोधकांकडून लेखी सूचना मागवा, म्हणजे त्यांना निव्वळ विरोधकाच्या भूमिकेतून बाहेर पडावे लागेल!’
बिरबलाची सूचना मान्य करत बादशहानं त्याला रात्रीच्या भोजनासाठी आग्रहानं थांबवून ठेवलं. ‘मी रात्री जेवायला घरी नसेन’ हे बिरबलानं घरी आधीच सांगून ठेवलं होतं.
Sunday, February 21, 2010
ज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो
बैठक संपल्यावर बादशहा आणि बिरबल शाही भोजनासाठी एकत्र गेले. मटारच्या करंज्या, हरभरा भात असा संपूर्ण शाकाहारी बेत होता. तोंडात तुकडा ठेवताच स्वादिष्ट सुखाची भावना भरून यावी अशा त्या करंज्यांचा आस्वाद घेता घेता बादशहा म्हणाला, ‘मला एक कळत नाही, अमूक देशांच्या खेळाडूंना इथं पाय ठेवायला देऊ नका, तमूक देशाशी खेळू नका अशी अतिरेकी भूमिका ही माणसं का घेतात? अरे हा काय पोरखेळ आहे का? राजकारण वेगळं असतं आणि खेळ, कला या गोष्टी वेगळ्या असतात!’
हरभरा भाताचा घास घेत, ताकाची वाटी हाती धरत बिरबल म्हणाला, ‘खाविंद, ही माणसं अशी अतिरेकी भूमिका घेतात हे तुमचं केवढं नशीब म्हणायचं?’ हे ऐकून बादशहा आश्चर्यानं म्हणाला, ‘आता ह्यात तुला माझं नशीब कुठं दिसलं?’
जिरे-हिंगाची मस्त फोडणी घातलेल्या ताकाचा घोट घेत बिरबल म्हणाला, ‘खाविंद, ज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो. अशी माणसं सत्तेत येऊ नयेत याची काळजी लोकच घेत असतात. आणि खरं सांगायचं तर अशा मानसिकतेच्या व्यक्तींना सत्तेची जबाबदारी नकोच असते. त्यांना दहशतीचं एक समांतर साम्राज्य फक्त उभं करायचं असतं.. आणि अशी दहशत टिकविण्यासाठी ते देशभक्तीच्या भडक व्याख्या करीत अतिरेकी भूमिका घेत राहतात..!’
बादशहा खाता खाता थांबून विस्मयानं सगळं ऐकत होता. बिरबलाचं तर्कशुद्ध विश्लेषण ऐकून त्याचा चेहरा खुलून आला व तो बिरबलाला म्हणाला, ‘म्हणजे फार काळजी करण्याची गरज नाही!’ करंजीचा शेवटचा घास घेत बिरबल म्हणाला, ‘काळजी करण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजेच!’ ‘सुभानअल्लाह क्या बात कही बिरबल’ असं म्हणत बादशहानं आपल्या हातानं आणखी दोन करंज्या बिरबलाच्या ताटात घातल्या!
Monday, February 1, 2010
काही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्यातून जगण्याची उभारी मिळते, संघर्षांला बळ प्राप्त होते
Wednesday, January 20, 2010
लोकशाहीची यंत्रणा चालायला हवी ना? आपल्यापुढं जे पर्याय आहेत त्यातून एक निवडायचा आणि अधिक चांगल्या पर्यायाची वाट पाहायची!
Tuesday, January 19, 2010
इतिहासातील चुकांमधून वर्तमानाने धडा घ्यायचा तर इतिहास जसाच्या तसा लिहिला जाणं आवश्यक नाही का?
बिरबल म्हणाला, ‘खाविंद, पुढं भविष्यात तुमचा एखादा खापर पणतू खोटा इतिहास लिहिल, त्यापेक्षा आपण आताच त्याची व्यवस्था केलेली बरी!’
अर्थात बादशहा हे ऐकून वरमला. त्याची ती स्थिती पाहून बिरबल म्हणाला, ‘खाविंद, राज्यकर्त्यांमध्ये आणि समाजाच्या नेतृत्वामध्येच जर इतिहास पचवण्याची ताकद नसेल तर समाजात ती कुठून येणार? आणि इतिहासातील चुकांमधून वर्तमानाने धडा घ्यायचा तर इतिहास जसाच्या तसा लिहिला जाणं आवश्यक नाही का?’ बादशहा हे ऐकून खिन्न झाला, कारण त्याची विवेकबुद्धी शाबूत होती.
Tuesday, January 12, 2010
समाजाला लांच्छनास्पद असलेल्या गोष्टी जगाला सांगणं, उजेडात आणणं हे कोणत्याही कलेचं एक महत्त्वाचं काम आहे
Sunday, January 3, 2010
तो तरुण खरं तर तुमच्या हिताचं सांगत होता, परंतु तुमची मन:स्थिती ठीक नसल्यानं तुमचा तोल गेला खाविंद!
बादशाह आणि बिरबल शेजारच्या राज्यातली वृत्तपत्रं उत्सुकतेनं चाळत बसले होते. त्या देशातल्या एका सभ्य व्यक्तीनं ‘विरोधी पक्ष अस्थीर असणं बरं नव्हे’ असं म्हटलं तर त्याला ‘तुम्ही तुमचं बघा, आमचं आम्ही बघून घेऊ असं’ उत्तर विरोधकांनी दिलं. ते वाचनू बादशहा म्हणाला,‘अरे ही माणसं चांगल्या मनानं सांगितलंले सुद्धा ऐकून का घेत नाहीत? ’ आपल्या हिताची गोष्टही ऐकून घ्यावीशी वाटत नाही’ बादशहाला काही ते पटलं नाही. दोघांमध्ये बराच वेळ ह्यावर वाद सुरू होता. दुसऱ्या दिवशी सकाळी बादशहा आणि बिरबल घोडय़ांवरून रपेट मारायला जाणार होते. परंतु बादशहाचा आवडता घोडा आजारी आहे असं पार्टीच्या प्रमुखानं सांगितलं. बादशहाचा मूड गेला. तो बिरबलाला म्हणाला, ‘आज माझा अंगरखाही नीट बसलेला नाही आणि घोडा आजारी आहे. आपण पयीच फिरायला जाऊया.’ दोघे फिरायला निघाले. बिरबल बादशहाला म्हणाला,‘पायीच जायचं आहे तर मग नेहमीपेक्षा वेगळ्या रस्त्यानं जाऊया!’ दोघेही निघाले. थोडं चालून गेल्यावर बादश्हा म्हणाला,‘हा रस्ता दुरूस्त करण्यासाठी ह्यावर्षी आपण निधी मंजूर केला होता ना?’ बिरबल म्हणाला,‘होय खाविंद, रस्ता बहुतेक नीट दुरूस्त केला नसणार. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा उखडला.’ थोडं पुढे एका इमारतीचं काम अध्र्यावरच बंद पडून शेवाळ धरलं होतं. ‘हे असं बंद का पडलंय?’ बादशहानं विचारलं. ‘माफी असावी खाविंद. आपले अधिकारी पैसे खाऊन बांधकामांना परवानगी देतात आणि मग त्याच व्यवहारात कमी जास्त झालं की काम बंद पाडतात.’ बिरबल म्हणाला. हे ऐकून बादशहाचा मूड अधिकच खराब झाला. भरीस भर म्हणून चालता चालता बादशहाच्या चपलेचा अंगठा तुटला. कसा तरी लंगडत, अडखळत बादशहा परतीच्या वाटेला निघाला. त्याला असं चालताना पाहून एक तरूण थांबला. त्यानं आपली पादत्राणं काढली आणि बादशहाला म्हणाला,‘हुजूर, आपण माझी पादत्राणं घालून जा. आपली चप्पल दुरूस्त करून मी राजवाडय़ावर आणून देतो.’ त्याचं ते बोलणं ऐकून बादशहाचं पित्त खवळलं आणि तो म्हणाला,‘तू एवढा क्षुल्लक नागरिक आणि तुझी ही हिम्मत? तुझी पादत्राणे बादशहाला घालायला देतोस़? अपमान करतोस माझा?’ तो तरुण भीतीने चळचळा कापू लागला. बिरबलानं त्याला जायला सांगितलं आणि बादशहाला म्हणाला,‘तो तरुण खरं तर तुमच्या हिताचं सांगत होता, परंतु तुमची मन:स्थिती ठीक नसल्यानं तुमचा तोल गेला खाविंद!’ त्या तशा अवस्थेतही बादशहाला हसू फुटलं. त्यानं त्या तरुणाला बोलावलं, त्याची पादत्राणं घातली आणि बिरबलाला म्हणाला,‘झाला का मला धडा शिकवून? चल आता, चहाची तलफ आली आहे जोरदार!’
Tuesday, December 29, 2009
असुरक्षितता, अस्थिरता, भीती, वास्तवाकडे पाठ फिरविण्यातली अपरिहार्यता यातून प्रत्येक क्षण साजरा करण्याची वृत्ती वाढत आहे
राजधानीवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि चार दिवस सर्वाना वेठीला धरलं होतं. राजधानीच्या रक्षक सैनिकांनी जीवाची बाजी लावून हल्लेखोरांना जेरबंद केलं. त्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा आपल्या सैनिकांच्या शौर्याची आणि जनतेच्या धीराची पावती म्हणून राज्यभर कार्यक्रम आयोजित करावेत, असा आदेश बादशहानं दिला होता. राजधानीत अनेक संघटनांनी, अनेक संस्थांनी आणि लोकांनीही उत्स्फूर्तपणे वेगवेगळे कार्यक्रम ठरविले होतेच. आपल्या जनतेची ही संवेदनशीलता पाहून बादशहा खूश झाला. प्रत्यक्ष तो दिवस उगवला तेव्हा बादशहा दिवसभर कुठं कुठं फिरून कार्यक्रम पाहत होता आणि दिवसभर, रात्रभर फिरून त्याच्या मनावर निराशेचे मळभ दाटून आले. सर्वत्र जणू उत्सव सुरू होते. वेदनेचा ठाव ठिकाणा नव्हता, जबाबदारीची जाणीव नव्हती आणि गांभीर्याचा अभाव होता. मद्याचा महापूर, रंगीबेरंगी वस्त्रे, धुंद नाचगाणी आणि शौर्याचे दिखाऊ पोवाडे सुरू होते. कार्यक्रमांचे आयोजक शहीदांवर जणू कुरघोडी करीत स्वत:च मिरवित होते. हिच का आपली ती संवेदनशील जनता, असा बादशहाला प्रश्न पडला. बादशहा पहाटे खिन्न मनाने राजवाडय़ावर परतला. सकाळी बिरबल आला तेव्हा बादशहानं आपल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणाला, ‘मला फार वाईट वाटले बिरबला, रात्री सर्वत्र जणू हल्ल्याच्या स्मृती साजऱ्या केल्या जात होत्या, कुठंही गांभीर्य नव्हतं, नुसता दिखाऊपणा!’
बिरबलाला बादशहाची मन:स्थिती कळली. तो म्हणाला, ‘खाविंद, तुमची निराशा साहजिकच आहे, परंतु मला तुम्हाला आणखीही काही सांगायचं आहे.’ अर्थातच बादशहानं बिरबलाला परवानगी दिली. त्यानुसार बिरबलानं तुरुंगातील एक कैदी हजर केला. तो कैदी शिक्षेच्या प्रतीक्षेत होता. बिरबलाच्या योजनेनुसार बादशहा त्या कैद्याला म्हणाला, ‘‘तुला फाशीची शिक्षा देण्याचं ठरलं आहे. तुझ्या फाशीला अजून एक आठवडा अवकाश आहे, तोवर तू मुक्त आहेस. काय हवं ते कर आणि आठवडाभरानं परत ये!’’ कैदी तिथून निघाला, अर्थातच त्याच्यावर सैनिकांची पाळत होती. आठवडाभरानं सैनिकांनी अहवाल सादर केला. त्यानुसार तो कैदी त्या काळात, खाणं-पिणं, जुगार खेळणं, स्त्रियांचा सहवास यात मनसोक्त रमला होता!
हा अहवाल ऐकल्यावर बादशहा बिरबलाला म्हणाला, ‘यातून तुला काय सिद्ध करायचं आहे बिरबल?’ बिरबल म्हणाला, ‘‘खाविंद, राजधानीवरील हल्ल्याच्या स्मृतिदिनी तुम्ही जे पाहिलं ते सगळं याच पठडीतलं होतं. असुरक्षितता, अस्थिरता, भीती, वास्तवाकडे पाठ फिरविण्यातली अपरिहार्यता यातून प्रत्येक क्षण साजरा करण्याची वृत्ती वाढत आहे. निमित्ताचे गांभीर्य लक्षातघेण्याऐवजी निमित्त पाहून मौजमजा करण्याचं प्रमाण वाढलं आहे.. रात्री मद्यधुंद होऊन नाचणारे अनेक जण सकाळी एकांतात रडत असतात आणि ते मात्र जगाला कळत नाही!’’
बादशहा गंभीर झाला, बिरबल म्हणाला, ‘खाविंद, हे सगळं पाहून, तुमच्या,माझ्या सारख्या काही व्यक्ती अस्वस्थ होतात हेच फक्त समाधान आहे!’ बादशहाला त्याक्षणी बिरबलाचा जेवढा आधार वाटला तेवढा त्यापूर्वी कधीही नव्हता वाटला!
Subscribe to:
Posts (Atom)