प्रीती ठाकूर... वय वर्षं २७... माकेर्टिंग मॅनेजर... गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाठदुखीचा त्रास तिला जाणवतोय. सतत एका जागेवर बसून काम करण्याचा परिणाम. पण, अशा प्रकारचा त्रास सहन करणारी प्रीती एकटीच नाही. दिवसाचे १२-१४ तास एकाच जागेवर बसून काम करायचं. सोबत, कामाचं टेन्शन आणि बदललेली लाइफस्टाइल आहेच. असा त्रास होणारी प्रीती एकटीच नाही. आजूबाजूला पाहिलं, तर एकंदरच शहरातील वकिर्ंग क्लास यंगस्टर्सना अनेक आजारांनी पछाडलेलं दिसतंय. कॉपोर्रेट वर्ककल्चरमध्ये काम करणारे आजचे यंगस्टर्स डायबीडिस, पाठदुखी, कॅन्सर यासारख्या लाइफस्टाइल आजारांना बळी पडताना दिसताहेत.
दिवसभर एका जागेवर बसून काम करणं, प्रचंड मानसिक तणाव, जंक फूड आणि कोल्ड ड्रिंकचं अधिक सेवन तसंच दारू, तंबाखू, गुटखा यासारखी व्यसनं ही आजच्या तरुणांची बदललेली लाइफस्टाइल. त्यातच व्यायामाचा अभाव आणि सतत बैठे काम करण्यामुळे जीवघेण्या आजारांना फार लवकर बळी पडत आहे.
पाठदुखी : सतत एका जागेवर बसून काम करण्यामुळे वजन वाढतं. महत्त्वाचं म्हणजे पाठीच्या मणक्यावर ताण येऊन पाठदुखीचा त्रास होतो. खुचीर्त अयोग्य रीतीने बसणं, मधून मधून ब्रेक न घेता सतत एकाच जागेवर बसून राहणं यामुळे हा त्रास वाढतच जातो. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ हा त्रास जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य उपचार घ्यायला हवेत.
डायबीटिस : मोठ्या शहरांमधील अनेकांना हा आजार असल्याचं दिसून आलं आहे. हाय प्रोफाइल म्हणून ओळखण्यात येणारा हा आजार शहरातील १४, ग्रामीण २.५ तर निमशहरी ५ टक्के व्यक्तींमध्ये आढळून येतो. जंक फूड आणि कोल्ड ड्रिंक्सचं अतिरिक्त प्रमाण हे यामागचं एक महत्त्वाचं कारण. त्यातच धुम्रपान, दारू आणि तंबाखू/गुटख्याचं सेवन यामुळे डायबीटिसबरोबरच कॅन्सर होण्याची शक्यताही बळावते. याबाबत वेळेतच जागृती करायला हवी. तसंच प्रतिबंधात्मक उपाय योजायला हवेत.
कॅन्सर : हल्ली फक्त मुलंच नाही तर मुलीही सर्रास धुम्रपान करताना दिसतात. ऑफिसमधलं वाढतं टेन्शन कमी करण्यासाठी दारू आणि सिगारेटचा आधार अनेक जण घेतात. यामुळे फुफ्फुस (लंग) आणि मुख (ओरल) कर्करोगाचं प्रमाण वाढलं आहे.
याशिवाय, आजच्या स्त्रियांचं लग्नाचं वय सरासरी ३० एवढं झालं आहे. अर्थात, यामुळे उशीरा गर्भधारणा होते. याचा परिणाम म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशण्टची वाढती संख्या.
हृदरोग : हार्ट डीसीजही (हृदरोग) बदलत्या लाइफस्टाइलचा परिणाम आहे. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या अनेकांमध्ये सर्रास दिसून येणारा हा आजार आता चाळीशीतच दिसून येऊ लागलाय. पिझ्झा, बर्गरसारख्या फॅटी फूडचा हा परिणाम. तिखट, तेलकट अशा या जंक फूडमुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक निर्माण होतात.
ओबेसिटी : अतिरिक्त प्रमाणात जंक फूडचं सेवन केल्यामुळे ओबेसिटी हा आजार उद्भवतो. लठ्ठपणामुळे डायबीटिस, हृदरोग, हायपर टेन्शन असे इतर आजारही निर्माण होतात. त्याचबरोबर सिंड्रोम ङ्ग हा जनुकीय विकृती (जेनेटिक डिसऑर्डर) नवीन आजार उद्भवत असल्याचं दिसून आलं आहे. मोठ्या शहरांमध्ये या आजाराचं प्रमाण लक्षणीय आहे. महिन्याला कमीत कमी ६० व्यक्ती, ज्यांचं वजन प्रमाणापेक्षा अधिक आहे ते सिंड्रोम ङ्ग ला बळी पडत आहेत.
वाढतं प्रदूषण, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव यामुळेही अनेक आजारांना तोंड द्यावं लागत आहे. पण, इतर आजारांना आळा घालणं कठीण असलं, तरी वेळेतच प्रतिबंध घालून हे लाइफस्टाइल आजार रोखता येऊ शकतात.
- हेल्थ वेल्थ टीम
...............
आजार रोखण्यासाठी काही उपाय :
रोजच्या रोज कमीत कमी ४० मिनिटं तरी व्यायाम करणं
ताजी फळं आणि हिरव्या भाज्यांचं अधिक सेवन
जंक/फास्ट फूड, रेड मीट टाळा
रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठणं
नो स्मोकिंग, नो ड्रिंक्स, नो टोबॅको
रोज ८ तास झोप
दिवसभरात कमीतकमी ८ ग्लास पाणी पिणं
तिखट, तेलकट पदार्थ टाळा
रिफाइन्ड ऑइलऐवजी ऑलिव्ह किंवा सोया ऑइल वापरा
------------- सौजन्य महाराष्ट्र टाईम्स
मराठी पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी - All क्रेडीट goes to respective writer
Tuesday, May 11, 2010
Thursday, May 6, 2010
तुम्ही पाहिलाय का असा महाराष्ट्र?
http://www.esakal.co
सर्व छायाचित्रे : मा. उद्धव ठाकरे
अजिंठा
बीबी का मकबरा
गणपतीपुळे
गेट वे ऑफ इंडिया
गोंदेश्वर मंदिर
हरिश्चंद्र गड
जयगड
जेजुरी
कोरलाई
महालक्ष्मी मंदिर
मुरुड जंजिरा
नळदुर्ग
पद्मदुर्ग
सागरी सेतू
शनिवारवाडा
सिंधुदुर्ग
उंदेरी
विधानभवन
विजयदुर्ग
Sunday, May 2, 2010
ताटातलं पोटापर्यंत कधी पोहचणार?
स्त्रिया ‘सुशिक्षित’ आहेत का? मिळालेल्या, मिळविलेल्या संधीतून त्या यशस्वी होत असल्या, तरी त्या स्वत:च्या आणि भोवतीच्या वास्तवाचा विचार करतात का? वास्तवात परिवर्तन घडविण्यासाठी त्याला त्या सामोऱ्या जातात का? वरवर बघता त्यांच्यात दिसणारी ‘आधुनिकता’ त्यांच्या मनाच्या तळापर्यंत झिरपली आहे का? की त्याही गतीच्या, चंगळवादाच्या, बाजारीकरणाच्या लाटेवर स्वार झाल्या आहेत? आज त्यांच्यासमोर अनेक संधींचं ताट वाढलेलं आहे. परंतु खरंच ते त्यांच्या पोटात जाणार आहे का?
महाराष्ट्रातील स्त्रीचा दर्जा, तिची प्रतिष्ठा यांचा विचार करताना एका दारुण वास्तवाकडे दुर्लक्ष करणं अशक्य आहे. एक प्रश्न विचारावासा वाटतो की, स्त्रिया कुठे आहेत आणि त्या कुठे दिसेनाशा होताहेत? ज्यांना भारतीय संस्कृतीत मोठय़ा आदराचं स्थान आहे, असं गर्वाने ऐकवलं जातं त्या स्त्रिया पुरुषांच्या संख्येच्या तुलनेत झपाझपा दृष्टीआड कशा होताहेत? गेल्या १०० वर्षांत लोकसंख्येतलं स्त्री-पुरुषांचं गुणोत्तर काय सांगतं? १९०१ साली १००० पुरुषांच्या बरोबर ९७१ स्त्रिया होत्या. २००१ साली त्या सरासरीने ९२७ आणि महाराष्ट्रात काही सधन जिल्ह्यांत ८०० पेक्षाही खाली आहेत! ‘वंशाला दिवा’ या पुरुषप्रधान मानसिकतेला याचा विसर पडला का, की हा दिवा देण्यासाठी तरी स्त्रिया हव्यात ना?
महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या या टप्प्यावर आणखी एका भीषण वस्तुस्थितीकडे बघणं, त्याला सामोरं जाणं आणि उपाययोजना करणं अग्रक्रमाने व्हायला हवं. ज्या स्त्रिया दिसेनाशा न होता, गर्भातच खुडल्या न जाता जन्मल्या, वाढल्या, शिकल्या वा न शिकल्या, पण पोटापाण्याच्या उद्योगाला लागल्या, त्या तरी जगण्याच्या वाटेवर निर्धास्तपणे चालू शकताहेत? सुरक्षित समजलं जाणारं घर हे घरातल्यांच्या हिंसाचाराने कित्येकांसाठी असुरक्षित झालंच आहे; पण आता घरात आणि रस्त्यावर दोन्हीकडे स्त्रिया गुंडांच्या, गुन्हेगारांच्या अत्याचाराच्या बळी ठरताहेत. जागतिकीकरण, खासगीकरण, बाजारीकरण यांनी गरिबी आणि श्रीमंतीत वाढलेली अपार मोठी दरी आणि त्यातून निर्माण झालेली झटपट आणि खूप पैसे मिळविण्याची हाव- यातून वाढत्या वेगानं फैलावणाऱ्या गुन्हेगारीमुळे जन्मल्यानंतरही स्त्रीला पुरुषापेक्षाही अधिक धोका आहे! त्यांना बलात्कारातलं ‘सुख’ स्त्रीदेहच देऊ शकतो!
महाराष्ट्रातल्या स्त्रियांकडे नजर टाकली तर अनेकदा महाराष्ट्राबाहेरच्या लोकांकडून असं ऐकायला मिळतं की, इथल्या स्त्रीचा पोशाखापासून वागण्या-बोलण्यापर्यंतचा बाजच वेगळा आहे! काही प्रमाणात यात तथ्य असेलही. शिक्षण, नोकरी, घराबाहेरच्या जगात वावरण्याचा आत्मविश्वास, इतर राज्यांच्या तुलनेतली ‘आधुनिकता’ या तिच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र, या शिकलेल्या मुली/स्त्रिया सुशिक्षित आहेत का? मिळालेल्या, मिळविलेल्या संधीतून त्या यशस्वी होत असल्या तरी त्या स्वत:च्या आणि भोवतीच्या वास्तवाचा विचार करतात का? वास्तवात परिवर्तन घडविण्यासाठी त्याला त्या सामोऱ्या जातात का? वरवर बघता त्यांच्यात दिसणारी ‘आधुनिकता’ मनाच्या तळापर्यंत झिरपली आहे का? की त्याही या गतीच्या, चंगळवादाच्या, बाजारीकरणाच्या लाटेवर स्वार झाल्या आहेत? आजूबाजूच्या जगाच्या या प्रकारच्या प्रवाहापासून दूर राहणं सोपं नाहीच; पण तरी त्या ते करत आहेत का? जुन्या स्त्रिया स्त्रीच्या पारंपरिक प्रतिमेच्या गुलाम ठरल्या आणि नव्या- या पोकळ आणि खोटय़ा आधुनिकतेच्या बळी आहेत, असं म्हणावं का?
..तरीसुद्धा नानाविध सवलती आणि संधींच्या रूपानं जणू एक भरलं ताट स्त्रियांच्या पुढय़ात येत आहे. घरातल्या सगळ्यांची जेवणं झाल्यावर उरलंसुरलं खाऊन, पाणी पिऊन ढेकर देणारी यापूर्वीची स्त्री- तिच्या पुढय़ात आलेल्या या ताटावर अनेकांच्या अनेकविध नजरा लागून राहिल्या आहेत. म्हणूनच मनात येतं, या ताटातलं तोंडात पडून पोटापर्यंत पोहचण्यासाठी स्त्रियांना अजून किती काळ वाट बघावी लागणार आहे?
IPL - क्रिकेट चा बाजार अन खेळ भावनेचा झुगार
अर्थात दोघींनीही आनंदानं बादशहाला आलिंगन दिलं. दोघीही एकत्र बादशहाच्या मिठीत असताना धाकटी मोठीला म्हणाली, ‘‘बिरबल भावजी आहेत तोवर आपले अवाजवी हट्ट पूर्ण होणार नाहीत!’’ आणि ते ऐकून बादशहाही मस्त हसला!
Wednesday, April 21, 2010
जोडी तुझी माझी
जोडी तुझी माझी
प्रियकर-प्रेयसी असो किंवा पती-पत्नी, कोणत्याही कपलमधलं नातं त्यांच्यातल्या खास बॉण्डिंगमधून खुलत जातं. हेल्दी रिलेशनशिप दोघांनाही उत्साही-आनंदी बनव
ते. तुम्ही जितके आनंदी असाल तितका त्याचा तुमच्या आरोग्यावर पॉझिटिव्ह परिणाम होत असतो.
.........
सोनाली आणि अमोल एक तिशीतलं छान कपल. अमोल सॉफ्टवेअर इंजिनीअर तर सोनाली एचआर पर्सन. दोघंही आपापल्या करिअरमध्ये बिझी. ऑफिसचे व्याप सांभाळून दोघंही थकून-भागून रात्रीच घरी यायचे. सकाळी उठून पुन्हा ऑफिस गाठायची घाईगडबड असायची. पण दोघांचंही नातं इतकं सुंदर होतं की जणू मेड फॉर इच अदर. सकाळी चहाचा पहिला कप अमोलकडून सोनालीच्या हातात मिळायचा. त्याचबरोबर भाजीपासून ते कांदा चिरुन देण्यापासून अनेक कामं तो करून ठेवायचा. तर त्याला आवडणारी भाजी, हटकून लागणारी स्वीट डिश ती आठवणीने त्याच्या टिफिनमध्ये ठेवायची. त्याचं बँकेतलं एखादं रुटिन काम ती न सांगता करून टाकायची. दिवसभरात कामाच्या व्यापातूनही वेळ काढून दोघं एकमेकांशी फोनवर बोलायचे. एखादा गोड एसएमएस दोघांच्याही गालावरची खळी खुलवून जायचा.
नातं, मग ते कोणतंही असो एकमेकांशी असलेल्या बॉण्डिंगमधून ते खुलत जातं. विशेषत: पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसी असेल तर दोघांच्या नात्यात आपसूकच एक गोडवा असतो. या नात्यातला गोडवा अधिकाधिक खुलवणं दोघांच्या हातात असतं. एकमेकांवरचा गाढ विश्वास, एकमेकांची काळजी, एकत्र असण्यातला आनंद, दोघांनी एकमेकांना दिलेला 'क्वॉलिटी टाइम' या साऱ्यातून नातं खुलतं आणि दोघंही आनंदी राहतात. जेव्हा मन आनंदी असतं तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. सुदृढ नाती आरोग्याच्या दृष्टीने केव्हाही उपयुक्त ठरतात. याबाबत सांगताना डॉ. सतीश नाईक म्हणतात की, विशिष्ट वयानंतर प्रत्येकाच्या शरीरात स्ट्रेस हामोर्न्स तयार होत असतात. मानसिक ताणतणाव अधिक असतील तर त्यांची निमिर्ती अधिक होते. पण रोजच्या आयुष्यातला तणाव कमी असला तर स्ट्रेस हामोर्न्स फारसे तयार होत नाहीत. त्यामुळे ब्लड प्रेशर, डायबीटिस यासारखे आजार होण्याची शक्यता कमी होते. नियमित झोप होत असल्याने शरीराला पुरेशी विश्रांती मिळते. अशा कपलमधलं सेक्सचं रिलेशन चांगलं असतं. महत्त्वाचं म्हणजे यातून समाधानी राहण्याचा आनंद मिळतो. एकमेकांवर खूप प्रेम करणारी, एकमेकांना सांभाळून घेणारी कपल म्हणजे हामोर्नियस कपल. एकमेकांचा सपोर्ट चांगला मिळत असल्याने मानसिक तणाव राहत नाहीत. ताणतणाव जितके कमी आणि तुमच्यातलं आनंदाचं समाधानाचं वातावरण जितकं अधिक तितके तुम्ही हेल्थवाइज फिट राहता इतकं साधं-सोपं हे गणित असल्याचं ते समजावून सांगतात.
मॅरिड कपलमध्ये हेल्दी नातं असण्याचा चांगला परिणाम मुलांवरही होतो. आपल्या आई-वडिलांमधलं खेळीमेळीचं, सुदृढ नातं, त्यांच्या नात्यातला गोडवा मुलं सतत जवळून पाहत असतात. त्यातून त्यांच्यावरही सकारात्मक परिणाम होतो. मुलं मानसिकदृष्ट्या स्टेबल राहिल्याने त्यांचा विकास चांगल्या तऱ्हेने होतो.
प्रत्येकाच्या आयुष्यात अनेकदा आजार, दुखणं -खुपणं येत असतं. एखाद्या गंभीर आजारात जीवनसाथीकडून मिळणारा मानसिक आधार महत्त्वाचा ठरतो. आजारपणात साथीदाराकडून प्रेमाने घेतली जाणारी काळजी मनाला उभारी देते आणि त्यातून लवकर रिकव्हरी होते. दोघांमधल्या हेल्दी रिलेशन्समुळे घडून येणारे हे पॉझिटिव्ह परिणाम.
............
तुमच्या दोघांमधलं नातं हेल्दी ठेवण्यासाठी या काही टिप्स :
* कम्युनिकेशन : दोघांमध्ये सुसंवाद होतो की नाही, हे लक्षात घ्या. एकमेकांशी बोलून, चर्चा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.
* शेअरिंग : एकमेकांबद्दलच्या भावना, एकमेकांचं सुखदु:ख शेअर करायला हवं. यातूनच विश्वासाचं नातं निर्माण होतं.
* प्रामाणिकपणा : दोघांचं नातं खरंच जपायचं असेल, तर खोटेपणाला थारा देऊ नका.
* आदर आणि विश्वास : एकमेकांपासून जवळ असा किंवा लांब; एकमेकांबद्दल आदरभाव आणि विश्वास ठेवायला शिका.
* वाद हाताळायला हवे : दोन भिन्न व्यक्तींमध्ये वादविवाद होतातच. आपल्यामधले वाद मतभेदांपर्यंतच शिल्लक ठेवा. त्यांना टोकांचं रूप देऊ नका.
* समजून घ्या : काही वेळा बाहेरच्या कोणत्या तरी कारणावरून तुमचा पार्टनर अपसेट असू शकतो. या गोष्टी त्याला तुम्हाला लगेच सांगायच्या नसतील. तेव्हा त्याच्या मागे लागून ती गोष्ट जाणून घेण्याचा अट्टाहास करू नका. थोडा वेळ जाऊ द्या.
* स्पेस द्या : प्रत्येकाचं स्वतंत्र, वैयक्तिक असं जग असतं. सगळ्याच गोष्टी त्याला/तिला तुम्हाला सांगायच्या नसतील किंवा त्याला/तिला आपल्या फ्रेण्ड्सबरोबर राहण्याची, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठीही वेळ हवा असतो. ते जगही त्यांना एन्जॉय करू द्या.
* एकमेकांना वेळ द्या : आजच्या धावपळीच्या जगात एकमेकांसाठी भरपूर वेळ नसतो. त्यामुळे दोघांनी आपल्या शेड्युलनुसार ठरवून एकमेकांना वेळ द्या. या वेळेत एखादं सरप्राइज डिनर किंवा गिफ्ट देऊन त्याला/तिला खुश करता येईल.
* पॉवर ऑफ टच : प्रत्येक वेळेस शरीरसंबंधांची गरज असतेच असं नाही. एक प्रेमाचा स्पर्श, एखादा रोमॅण्टिक किस तुमच्या सर्व भावना त्याच्या/तिच्यापर्यंत पोहचवू शकतो.
* सणसमारंभ साजरे करा : तुम्हाला वेळ नसला, तरी त्याच्यासाठी, त्याच्या घरच्यांसाठी आणि पर्यायाने तुम्हाला होणाऱ्या आनंदासाठी सणसमारंभ साजरे करा किंवा इतरांकडे होणाऱ्या समारंभांना हजर रहा. आजच्या धावपळीच्या जगात ते शक्य नाही, हे मान्य. पण, तरीही जमेल तेव्हा हे करून पहा. सासरची मंडळी सुनेवर खुश होतीलच.
* लविंग नोट : कामाच्या धबडग्यात कोणी एकापासून लांब असू शकतं किंवा एकाच घरात राहूनही दोघांची दोनचार भेट होत नाही. अशा वेळी एकमेकांना मेसेज, इमेल किंवा घरी चिठ्ठी लिहून आपलं त्याच्यावर किती प्रेम आहे, या भावना व्यक्त करायला हरकत नाही.
* टीका नको : सतत एकमेकांवर किंवा त्यांच्या घरच्यांवर टीकेचा आसूड उगारायला नको.
Thanks Maharashtra Times Team
प्रियकर-प्रेयसी असो किंवा पती-पत्नी, कोणत्याही कपलमधलं नातं त्यांच्यातल्या खास बॉण्डिंगमधून खुलत जातं. हेल्दी रिलेशनशिप दोघांनाही उत्साही-आनंदी बनव
ते. तुम्ही जितके आनंदी असाल तितका त्याचा तुमच्या आरोग्यावर पॉझिटिव्ह परिणाम होत असतो.
.........
सोनाली आणि अमोल एक तिशीतलं छान कपल. अमोल सॉफ्टवेअर इंजिनीअर तर सोनाली एचआर पर्सन. दोघंही आपापल्या करिअरमध्ये बिझी. ऑफिसचे व्याप सांभाळून दोघंही थकून-भागून रात्रीच घरी यायचे. सकाळी उठून पुन्हा ऑफिस गाठायची घाईगडबड असायची. पण दोघांचंही नातं इतकं सुंदर होतं की जणू मेड फॉर इच अदर. सकाळी चहाचा पहिला कप अमोलकडून सोनालीच्या हातात मिळायचा. त्याचबरोबर भाजीपासून ते कांदा चिरुन देण्यापासून अनेक कामं तो करून ठेवायचा. तर त्याला आवडणारी भाजी, हटकून लागणारी स्वीट डिश ती आठवणीने त्याच्या टिफिनमध्ये ठेवायची. त्याचं बँकेतलं एखादं रुटिन काम ती न सांगता करून टाकायची. दिवसभरात कामाच्या व्यापातूनही वेळ काढून दोघं एकमेकांशी फोनवर बोलायचे. एखादा गोड एसएमएस दोघांच्याही गालावरची खळी खुलवून जायचा.
नातं, मग ते कोणतंही असो एकमेकांशी असलेल्या बॉण्डिंगमधून ते खुलत जातं. विशेषत: पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसी असेल तर दोघांच्या नात्यात आपसूकच एक गोडवा असतो. या नात्यातला गोडवा अधिकाधिक खुलवणं दोघांच्या हातात असतं. एकमेकांवरचा गाढ विश्वास, एकमेकांची काळजी, एकत्र असण्यातला आनंद, दोघांनी एकमेकांना दिलेला 'क्वॉलिटी टाइम' या साऱ्यातून नातं खुलतं आणि दोघंही आनंदी राहतात. जेव्हा मन आनंदी असतं तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. सुदृढ नाती आरोग्याच्या दृष्टीने केव्हाही उपयुक्त ठरतात. याबाबत सांगताना डॉ. सतीश नाईक म्हणतात की, विशिष्ट वयानंतर प्रत्येकाच्या शरीरात स्ट्रेस हामोर्न्स तयार होत असतात. मानसिक ताणतणाव अधिक असतील तर त्यांची निमिर्ती अधिक होते. पण रोजच्या आयुष्यातला तणाव कमी असला तर स्ट्रेस हामोर्न्स फारसे तयार होत नाहीत. त्यामुळे ब्लड प्रेशर, डायबीटिस यासारखे आजार होण्याची शक्यता कमी होते. नियमित झोप होत असल्याने शरीराला पुरेशी विश्रांती मिळते. अशा कपलमधलं सेक्सचं रिलेशन चांगलं असतं. महत्त्वाचं म्हणजे यातून समाधानी राहण्याचा आनंद मिळतो. एकमेकांवर खूप प्रेम करणारी, एकमेकांना सांभाळून घेणारी कपल म्हणजे हामोर्नियस कपल. एकमेकांचा सपोर्ट चांगला मिळत असल्याने मानसिक तणाव राहत नाहीत. ताणतणाव जितके कमी आणि तुमच्यातलं आनंदाचं समाधानाचं वातावरण जितकं अधिक तितके तुम्ही हेल्थवाइज फिट राहता इतकं साधं-सोपं हे गणित असल्याचं ते समजावून सांगतात.
मॅरिड कपलमध्ये हेल्दी नातं असण्याचा चांगला परिणाम मुलांवरही होतो. आपल्या आई-वडिलांमधलं खेळीमेळीचं, सुदृढ नातं, त्यांच्या नात्यातला गोडवा मुलं सतत जवळून पाहत असतात. त्यातून त्यांच्यावरही सकारात्मक परिणाम होतो. मुलं मानसिकदृष्ट्या स्टेबल राहिल्याने त्यांचा विकास चांगल्या तऱ्हेने होतो.
प्रत्येकाच्या आयुष्यात अनेकदा आजार, दुखणं -खुपणं येत असतं. एखाद्या गंभीर आजारात जीवनसाथीकडून मिळणारा मानसिक आधार महत्त्वाचा ठरतो. आजारपणात साथीदाराकडून प्रेमाने घेतली जाणारी काळजी मनाला उभारी देते आणि त्यातून लवकर रिकव्हरी होते. दोघांमधल्या हेल्दी रिलेशन्समुळे घडून येणारे हे पॉझिटिव्ह परिणाम.
............
तुमच्या दोघांमधलं नातं हेल्दी ठेवण्यासाठी या काही टिप्स :
* कम्युनिकेशन : दोघांमध्ये सुसंवाद होतो की नाही, हे लक्षात घ्या. एकमेकांशी बोलून, चर्चा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.
* शेअरिंग : एकमेकांबद्दलच्या भावना, एकमेकांचं सुखदु:ख शेअर करायला हवं. यातूनच विश्वासाचं नातं निर्माण होतं.
* प्रामाणिकपणा : दोघांचं नातं खरंच जपायचं असेल, तर खोटेपणाला थारा देऊ नका.
* आदर आणि विश्वास : एकमेकांपासून जवळ असा किंवा लांब; एकमेकांबद्दल आदरभाव आणि विश्वास ठेवायला शिका.
* वाद हाताळायला हवे : दोन भिन्न व्यक्तींमध्ये वादविवाद होतातच. आपल्यामधले वाद मतभेदांपर्यंतच शिल्लक ठेवा. त्यांना टोकांचं रूप देऊ नका.
* समजून घ्या : काही वेळा बाहेरच्या कोणत्या तरी कारणावरून तुमचा पार्टनर अपसेट असू शकतो. या गोष्टी त्याला तुम्हाला लगेच सांगायच्या नसतील. तेव्हा त्याच्या मागे लागून ती गोष्ट जाणून घेण्याचा अट्टाहास करू नका. थोडा वेळ जाऊ द्या.
* स्पेस द्या : प्रत्येकाचं स्वतंत्र, वैयक्तिक असं जग असतं. सगळ्याच गोष्टी त्याला/तिला तुम्हाला सांगायच्या नसतील किंवा त्याला/तिला आपल्या फ्रेण्ड्सबरोबर राहण्याची, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठीही वेळ हवा असतो. ते जगही त्यांना एन्जॉय करू द्या.
* एकमेकांना वेळ द्या : आजच्या धावपळीच्या जगात एकमेकांसाठी भरपूर वेळ नसतो. त्यामुळे दोघांनी आपल्या शेड्युलनुसार ठरवून एकमेकांना वेळ द्या. या वेळेत एखादं सरप्राइज डिनर किंवा गिफ्ट देऊन त्याला/तिला खुश करता येईल.
* पॉवर ऑफ टच : प्रत्येक वेळेस शरीरसंबंधांची गरज असतेच असं नाही. एक प्रेमाचा स्पर्श, एखादा रोमॅण्टिक किस तुमच्या सर्व भावना त्याच्या/तिच्यापर्यंत पोहचवू शकतो.
* सणसमारंभ साजरे करा : तुम्हाला वेळ नसला, तरी त्याच्यासाठी, त्याच्या घरच्यांसाठी आणि पर्यायाने तुम्हाला होणाऱ्या आनंदासाठी सणसमारंभ साजरे करा किंवा इतरांकडे होणाऱ्या समारंभांना हजर रहा. आजच्या धावपळीच्या जगात ते शक्य नाही, हे मान्य. पण, तरीही जमेल तेव्हा हे करून पहा. सासरची मंडळी सुनेवर खुश होतीलच.
* लविंग नोट : कामाच्या धबडग्यात कोणी एकापासून लांब असू शकतं किंवा एकाच घरात राहूनही दोघांची दोनचार भेट होत नाही. अशा वेळी एकमेकांना मेसेज, इमेल किंवा घरी चिठ्ठी लिहून आपलं त्याच्यावर किती प्रेम आहे, या भावना व्यक्त करायला हरकत नाही.
* टीका नको : सतत एकमेकांवर किंवा त्यांच्या घरच्यांवर टीकेचा आसूड उगारायला नको.
Thanks Maharashtra Times Team
Subscribe to:
Posts (Atom)

