Thursday, November 4, 2010

Vastushatra

वास्तुशास्त्राची ओळख

तसा हा विषय आपनास नविन वाटतो पण विषय तसा नवीन नाही; कारण मनुष्य तेवडा विचार करत नाही, त्याच्याकड़े तेवडा वेळ नाही आहे, पण मित्रहो आपण या विषयावर गांभिर्याने विचार केला पाहिजे यावर तुमचा प्रश्न असेल तो म्हणजे का बरे ? मित्रहो तुमचे म्हनने तुमचा प्रश्न बरोबर आहे म्हनुनच आपण या विषयावर येथे माहिती बघणार आहोत,

प्रथम आपणाला या वास्तुशास्त्राची ओळख करुन घेणे आवश्यक आहे वास्तुशास्त्र म्हणजे नेमक काय असा विचार डोक्यात येतो। मित्रहो, वास्तु याचा अर्थ आहे - निवास करने, वास्तुशास्त्र हे निवास कसा करावा याचे शास्त्र आहे वास्तुशास्त्र हे वस्तु पासून बनले आहे पृथ्वी, जल, अग्नि, वायु व आकाश या सर्वांचा उपयोग कशाप्रकारे करावा याचे ज्ञान वास्तुशास्त्र करुन देते ।

संक्षिप्तपने बघण्याचे झाले तर वास्तुशास्त्र हे असे ज्ञान आहे जे आपणास घर, बंगला, दुकान, फैक्ट्री यांची रचना कशी करवी की त्यामुळे मनुष्यास स्थैर्य, सुख, शांती, समाधान, यश, धन, ऐश्वर्य मिळावे तसेच त्याला सर्व क्षेत्रात शुभता प्राप्त कीर्ति ।मनुष्य हा यश कीर्ति हे मिळवन्यासाठी प्रयत्न करत असतो पण हे करताना त्याला दुःख, रोग, अशांति विघ्न यानाही तोंड द्यावे लगते हे सर्व करत असताना आपणास या अड़चनी का येतात याचा आपण विचार करतो पण आपणास त्याचे उत्तर मिळत नाही या सर्वाचा विचार आपण येथे करुया त्यासाठी आपण थोड़ी या शास्त्राची अधिक माहिती या ठिकाणी बघूया ।

वास्तुशास्त्र कथा

वास्तुशास्त्रच्या वास्तुपुरुषाच्या तश्या दोन- तिन कथा आहेत त्यातील एक कथा आपण येथे पाहणार आहोत, त्यातील एक - फार प्राचीन काळी अंधकासुर नावाचा महापराक्रमी राक्षस होता । पराक्रमी होता त्याचा त्याला फार गर्व होता मुळात देव-राक्षस वैर्य मग काय आपल्या परक्रमाच्या गर्वाने मदमस्त झालेल्या या अन्धकासुराने देवांना सळो की पळो केले होते त्याच्या त्रासाने हतबल झालेल्या देवांनी त्राही त्राही भगवन म्हणत श्री शंभु महदेवांकड़े धाव घेतली महादेवांनी लगेचच शस्त्र उचलले त्यांनी अंधकासुराला युद्धाचे आवहान केले त्याने आवहान स्वीकारले । श्री शिवशंकर आणि अंधकासुर यांच्यात घनघोर युद्ध झाले पण शेवटी श्री शिवशंकरांचा विजय झाला । अंधकासुर मरण पावला । या युद्धामध्ये झालेल्या परिश्रमाने शंकरांच्या अंगाला ज्या घामाच्या धारा सुटल्या, त्यातील एका घामाच्या थेंबातुन एका करालपुरुषाचा जन्म झाला हाच तो वास्तुपुरुष ।

या करालपुरुषाने तेथेच मरूण पडलेल्या अन्धकासुराच्या प्रेताचा प्रथामतः फडशा पाडला पण त्याची भूख कही केल्या भागेना मग त्याने भगवन श्री शिवशंकरांची आराधना केलि आणि त्यांच्याकडे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यावरील काहीही खावुन टाकन्याची अनुमति मागितली वर मागताच वर देने आशी ख्याति भोलेनाथ श्री शिवशंकर यांची त्यानी त्याला तथास्तु म्हणुन वर दीला । वर मिळाल्यावर त्याने जे कही दीसेल ते खावुन टाकन्यास सुरुवात केली त्याने मन्दिर, डोंगर, घर, वृक्ष, प्रसाद, प्रासाद काहीही मागे सोडले नाही त्याने अक्षरशः खाण्याचा सपाटाच लावला, त्यामुळे तीन्ही लोकांत हाहाःकार उडाला देव, दानव, मानव सर्वच घाबरले । या करालपुरुषाला कसे आवरयचे ? असा मोठा प्रश्न त्यांना पडला कारण तो शिवपुत्र होता (त्याचा जन्म शिवशंकर यांच्या घामाच्या थेंबातुन झालेला।) त्याला युद्धात पराजीत करनहि कठिन होते । आता काय करावे सर्वच मोठया पेचात पडले ।

देव-दानव यांना त्यांच्यातील वैर विसरून एकत्र यावे लागले । दोघांनी मिळुन एक युक्ति शोधली त्याप्रमाणे ते दोघेही एकाचवेळी वास्तुपुरुषावर चाल करुन गेले त्यांनी ठरवलेल्या युक्तीप्रमाणे त्याला पकडले व जमिनीवर पालथे पाडून दाबुन धरले त्यावेळी त्याचे डोके ईशान्य दिशेकडे राहिल याची दक्षता घेतली ।

वस्तुपुरुषाला खाली पालथे पाडल्यावर प्रतेक देव-दानव यांनी तो उठू नये म्हणुन त्याला सगळीकडून प्रतेकी एकाने धरून ठेवले । ईशान्य ही दिशा शिवशंकर यांची आपल्या पित्याच्या पायावर डोके आल्यामुळे आपल्या पित्याला हात जोडून नमस्कार करणे तसेच आर्शीवाद घेण्यासाठी तेथे थांबने या गोष्टी ओघाने आल्याच । देव-दानव यांनी श्री शिवशंकर यांची करुना भाकाली आणि त्यांनी त्यांच्या पुत्राला समज द्यावी अशी विनंती केलि । पण त्याल्या शिवशंकर यांनी काहीही काहीही खावुन टाकण्याचा वर दिला होता । मग सर्वांची परत बराच वेळ चर्चा झाली । सरतेशेवटी एक तोडगा निघाला । या तोडग्यानुसार पृथ्विवरिल सर्व मानवांनी दररोज भोजन आधी एक घास वास्तुपुरुषासाठी बाजूला काढावा व हेच अन्न त्याने त्याचा नित्य आहार म्हणुन खावे तसेच नविन घर बांदल्यावर वास्तुपुरुषाची पूजा करावी व त्यावेळी त्याला दिलेले अन्न त्याचा नेहमीचा आहार असावे । आशा घराचे रक्षण वस्तुपुरुषाने करावे असे ठरले ।

तसेच यज्ञ उत्सवाच्या वेळी प्रारंभी दिलेला बलि (नैवेज्ञ) हाही तुझाच आहार राहिल तसेच जे वास्तुपुजा करनार नाहीत तेहि तुझाच आहार बनतील तसेच अज्ञानाने केलेला यज्ञ हाही तुझाच आहार राहिल । आशा प्रकारे त्याला वचन दिले गेले आणि पुढे तो वास्तुपुरुष या नावाने प्रचलित झाला । तेव्हापासून वास्तुशांति करण्याची प्रथा प्रचलित झाली । कोणतीही नविन वास्तु बंधल्यावर किंवा वस्तुत कोताही बदल (जीर्णोद्धार) केल्यानंतर वास्तुशांति करणे अनिवार्य आहे । नाहीतर ती वास्तु वस्तुपुरुशाचा आहार बनेल व तेथे स्मशान होइल असा उल्लेख मत्स्यपुराण अध्याय-२५३ मध्ये ओवी नम्बर १७, १८, १९ मध्ये उल्लेखले आहे।

वास्तुपुरुष पालथा पडल्यानंतर तो उठू नये म्हणुन त्याला देव-दानव यांनी सगळीकडून चारही बाजूने तसेच त्याच्या अंगावर चढूण धरून ठेवले होते त्याच्या त्या शरीराचा तो तो प्रतेक भाग त्यावर स्थान्पत्र झालेल्या देवतेच्या नावाने ओळखला जावू लागला । सर्व देवतांचा यावर निवास असल्यामुळे तो पुढे वास्तुपुरुष या नावाने प्रचलित झाला। त्याला पकडून धरलेल्या एकूण ४५ देवता आहेत व त्या त्याच्या अंगावर स्थानापत्र आहेत त्याची आकृति पुढे आहे । वास्तुपुरुष आणि त्याच्या अंगावर रेखांकित केलेल्या ४५ देवतांच्या या रेखाचित्रास वास्तुपदमंडल असे म्हणतात । याचा उपयोग मनुष्यास राहण्ययोग्य निवास बांधताना होतो । कारण यातील प्रतेक देवतेचे वेगळे एक तत्त्व आहे । त्या तत्वानुसार प्रतेक स्थानाची फलश्रुति प्राप्त होते । बांधकाम करतांन जर यात कही दोष राहिले तर त्या त्या देवतेच्या तत्वाची हनी होते व त्याचा त्रास वास्तु मालकास तसेच त्या वास्तूत निवास करणारी व्यक्तिस होतो । म्हणुन वास्तु-निवासचे बांधकाम करताना याची काळजी घ्यावी लागते ।

अष्टदिशा

अष्टदिशा : पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य या आठ दिशा आहेत.

१. पूर्व दिशा : या दिशेचा दिशापालक इंद्र देव आहे. त्याची पत्नी शची देवी आहे. त्याचे नगर (पूर) अमरावती आहे. त्याचे वाहन पांढरा हत्ती (ऐरावत) आहे. त्याचे आयुध वज्रायुध हे आहे. या दिशेची राशी मेष (१) , वृषभ (२) आहे. या दिशेचा रंग श्वेत (पांढरा) आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला ऐश्वर्यं लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह सूर्य (रवी) हा आहे.

२. आग्नेय दिशा : या दिशेचा दिशापालक अग्नी देव आहे. त्याची पत्नी स्वाहा देवी आहे. त्याचे नगर (पूर) तेजोवती आहे. त्याचे वाहन मेंढा आहे. त्याचे आयुध भोप (रोज) / राग (क्रोध) हे आहे. या दिशेची राशी मिथुन (3) आहे. या दिशेचा रंग लाल/तांबडा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धान्य लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह शुक्र हा आहे.
३. दक्षिण दिशा : या दिशेचा दिशापालक यम देव आहे. त्याची पत्नी शामला देवी आहे. त्याचे नगर (पूर) संयमनी आहे. त्याचे वाहन महिष आहे. त्याचे आयुध कालपाश हे आहे. या दिशेची राशी कर्क (४), सिंह (५) आहे. या दिशेचा रंग लाल आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला आदि लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह मंगळ हा आहे.

४. नैऋत्य दिशा : या दिशेचा दिशापालक नैऋती देव आहे. त्याची पत्नी दीर्घा देवी आहे. त्याचे नगर (पूर) कृष्णांग आहे. त्याचे वाहन नर (मनुष्य) आहे. त्याचे आयुध कुंत हे आहे. या दिशेची राशी कन्या (६) आहे. या दिशेचा रंग धूम्र आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धैर्य लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचे ग्रह राहू-केतू हे आहेत.
 
५. पश्चिम दिशा : या दिशेचा दिशापालक वरुण देव आहे. त्याची पत्नी कालिका आहे. त्याचे नगर (पूर) श्रद्धावती आहे. त्याचे वाहन मगर आहे. त्याचे आयुध पाश हे आहे. या दिशेची राशी तुल (७) व वृश्चिक (८) आहे. या दिशेचा रंग लाल, तांबडा व काळा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला गज लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह शनीदेव हा आहे.
 
६. वायव्य दिशा : या दिशेचा दिशापालक वायूदेव आहे. त्याची पत्नी अंजनी देवी आहे. त्याचे नगर (पूर) गंधवती आहे. त्याचे वाहन हरीण आहे. त्याचे आयुध ध्वज हे आहे. या दिशेची राशी धनु (९) आहे. या दिशेचा रंग पांढरा, निळा, काळा, करडा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला विजय लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह चंद्र हा आहे.
 
७. उत्तर दिशा : या दिशेचा दिशापालक कुबेर देव आहे. त्याची पत्नी चित्रलेखा देवी आहे. त्याचे नगर (पूर) अलकावती आहे. त्याचे वाहन पांढरा घोडा आहे. त्याचे आयुध खड्ग हे आहे. या दिशेची राशी मकर (१०), कुंभ (११) आहे. या दिशेचा रंग पिवळा, पोपटी, हिरवा, पिवळसरपांढरा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धन लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह बुध हा आहे.
८. ईशान्य दिशा : या दिशेचा दिशापालक देवाधिदेव महादेव आहे. त्याची पत्नी पार्वती देवी आहे. त्याचे नगर (पूर) कैलास (हिमालय) आहे. त्याचे वाहन वृषभ (बैल) आहे. त्याचे आयुध त्रिशूळ हे आहे. या दिशेची राशी मीन (१२) आहे. या दिशेचा रंग हिरवा, पांढरा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला संतान लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह गुरु हा आहे.  

घराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच सिंहद्वार

सिंहद्वार : घराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच सिंहद्वार. घराचे मुख्य प्रवेशद्वार तसेच कंपाऊंड गेट दोन्हीला सिंहद्वार इतकेच महत्व आहे. घरासाठी चारही दिशांना प्रवेशद्वार करता येते फक्त ते कोठे असावे म्हणजे ते वास्तू एकाशितीपद मंडळाच्या कोणत्या पदात असावे म्हणजे त्याचा आपल्याला चांगला अनुभव येतो ते आपणास खालील आकृती व माहितीवरून स्पष्ट होईल.

   
मयमतम् (अ. ३० ओ. ४४-४६) मध्ये आलेल्या संदर्भनुसार बत्तीस पद वास्तुमंडळात महेंद्र, राक्षस (गृहक्षत, बृहत्क्षत), पुष्पदंत व भल्लाट या चार पदांवरच द्वार असावे कारण हि चारही द्वार त्यांच्या त्यांच्या अधिपती देवतांद्वारे संरक्षित असतात. बुद्धिमान लोकांना याच प्रकारच्या द्वाराची योजना आत अथवा बाहेर करणे शुभ मानले आहे बाकी सर्व द्वार दोषयुक्त मानली आहेत. तसेच ब्रह्म स्थानाच्या मधोमध (आकृतीत तुटक रेषा दाखवली आहे) द्वार दोषयुक्त मानले आहे. थोडक्यात घराचे द्वार इमारतीच्या मध्यरेषेच्या डावीकडे असावे.
 
मत्स्यपुराण मध्ये आलेल्या संदर्भनुसार पूर्वेकडून जयंत व महेंद्र या पदात, बुद्धिमान लोकांसाठी याम्य म्हणजेच यम, वितथ या पदात, पश्चिमेला पुष्पदंत व वरुण या पदात आणि उत्तरेला भल्लाट व सोम या पदात द्वार शुभ मानले आहे.



जमिनीचे / भूमीचे परीक्षण - 01
वास्तुशास्त्राप्रमाणे भूमीचे म्हणजेच जमिनीचे परीक्षण करणे या गोष्टीला ऋषी-मुनींनी खूप प्राधान्य दिले आहे. जमिनीचे परीक्षण कसे करावे याचे काही मुद्दे :

१. जी जमीन शेतीसाठी उत्तम उपजावू आहे. ज्या जमिनीवर झाडे, फुले, हिरव्या वनस्पती चांगल्या प्रमाणे वाढतात अशी जमीन चांगली समजली जाते. तसेच या जमिनी मध्ये उंदीर, घूस यांची बीळे काटेरी वनस्पती, झाडे असू नयेत अशी जमीन निकृष्ट समजली जाते. तसेच त्या भूमीत शल्य (हाडे) असतील तर अशी भूमीही वाईट समजली जाते. जर जमीन खाली वर असेल तर म्हणजे जमिनीवर योग्य उतार, सापाटपणा नसेल, जमिनीत खाच-खळगे असतील तर अशी जमीन दोषयुक्त मानली जाते. जमीन कशी आहे त्याप्रमाणे त्याचे दुष्परीणाम मिळतात. तसेच त्या जमिनिला कशाप्रकारचा गंध (वास) आहे याचाही विचार केला गेलेला आहे. दुर्गंधी जमीन वाईट समजली जाते.

२. भूमी मध्यात एक हाथ लांब म्हणजे साधारणता दीड फुट लांब रुंद व उंच असा खड्डा खोदावा त्यास गाईच्या शेणाने सारवावे व त्यामध्ये चार मुख दिशांना म्हणजेच पूर्व, दक्षिण, पश्चिम व उत्तर या दिशांना तुपाचे दिवे लावावे त्यापैकी जर पूर्व दिशेचा दिवा जास्त काळ तेवत राहिला तर अशी भूमी ब्राम्हण वर्णासाठी उत्तम समजली जाते. अशाप्रकारे उत्तर, दक्षिण व पश्चिम दिशेचे दिवे अनुक्रमे क्षत्रिय, वैश्य व शुद्र वर्णासाठी शुभ समजली जाते. तसेच जर चारही दिशेचे दिवे तेवत राहिले तर ती जमीन सर्व वर्णासाठी उत्तम समजली जाते.

३. जमीन नांगराने नांगरून त्यात सर्व प्रकारची बी (मुग, तील, गहू  ईत्यादी) पुरावीत. जर ते बी तीन रात्रीत उगवले म्हणजेच त्याला जर अंकुर फुटले तर ती जमीन उत्तम, पाच रात्रीत अंकुर फुटले तर ती जमीन मध्यम व सात रात्रीत अंकुर फुटले तर ती जमीन कनिष्ट समजली जाते अशी जमीन सर्व प्रकारच्या कार्यासाठी वर्ज्य समजली जाते. (संदर्भ मत्स्यपुराण अध्याय २५३) .

वास्तुशास्त्राप्रमाणे जमिनीचा आकार - 02
१) गोमुखी प्लॉटस : जर ईशान्य कोपरा व आग्नेय कोपरा ९० अंश पेक्षा कमी असेल व वायव्य व नैऋत्य कोपरा ९० अंश पेक्षा जास्त असेल तर असा प्लॉट गोमुखी प्लॉट मध्ये येतो. पण हा अशुभ गोमुखी समजला जातो. कारण याचा परिणाम अशुभ असतो पैसा भरमसाठ मिळतो पण खर्चही तसाच होतो बचत होत नाही.

तसेच जर फक्त ईशान्य कोपरा वाढ असेल तर असाही प्लॉट गोमुखी समजला जातो. याचा परिणाम शुभ असतो पैसा चांगल्या मार्गाने मिळत जातो. पुढील आकृतीवरून अधिक स्पष्ट होईल.

२) व्याघ्रमुखी प्लॉटस : जर ईशान्य कोपरा व आग्नेय कोपरा ९० अंश पेक्षा जास्त असतील व वायव्य व नैऋत्य कोपरा ९० अंश पेक्षा कमी असतील तर असा प्लॉट व्याघ्रमुखी प्लॉट मध्ये येतो. पण हा अशुभ समजला जातो.

वायव्य कोपरा ९० अंशा पेक्षा कमी असेल व ईशान्य कोपरा ९० अंशा पेक्षा जास्त असेल, तर तसेच नैऋत्य व आग्नेय हे दोन्ही कोपरे बरोबर ९० अंश असतील तर असा प्लॉट व्याघ्रमुखी प्लॉट मध्ये येतो. पण हा अशुभ समजला जातो. कारण वस्तूचा वायव्य कोपरा वाढ असल्यामुळे पैशाचा अपव्यय होतो, शत्रुत्व वाढते, हातून पापकर्मे घडतात अशा प्रकारचे अशुभ परिणाम होतात.

नैऋत्य कोपरा ९० अंशा पेक्षा कमी असेल व आग्नेय कोपरा ९० अंशा पेक्षा जास्त असेल, तसेच वायव्य व ईशान्य हे दोन्ही कोपरे बरोबर ९० अंश असतील तर असा प्लॉट व्याघ्रमुखी प्लॉट मध्ये येतो. पण हा अशुभ समजला जातो. कारण वस्तूचा नैऋत्य कोपरा वाढ असल्यामुळे हातून पापकर्मे घडतात, कष्ट करूनही पैसा टिकत नाही. तसेच आत्मघाती प्रसंग येतात, अपघात, आत्महत्या अशा प्रकारचे अशुभ प

 

वास्तुशास्त्राप्रमाणे जमिनीचा आकार - 03

यल (L) आकाराचे प्लॉट्स : आपण प्लॉट खरेदी करताना तो कसा पाहिजे हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण काही प्लॉट्स (L) यल आकाराचे असतात. असे प्लॉट आपली वास्तू बांधण्यासाठी अयोग्य असतात. असे यल आकाराचे प्लॉट आपल्याला त्याचा कोणता कोपरा कट आहे त्या प्रमाणे अशुभ फळे देतात. यल (L) आकाराच्या प्लॉट मध्ये कोणता कोपरा कट असल्यावर त्याचे अशुभ परिणाम कोणते मिळतात ते आपण पुढील प्रमाणे पाहूया.

(अ) ईशान्य कोपरा कट असलेला (L) आकाराचा प्लॉट :
अनेक प्रकारच्या संकटाना तोंड द्यावे लागते, संतती मध्ये पुरुष संतती कमी व स्त्री संतती जास्त तसेच वास्तू मालकास मानसिक स्वास्थ्य मिळत नाही, आर्थिक संकटे येतात, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा उत्पन्न होते.

(ब) आग्नेय कोपरा कट असलेला (L) आकाराचा प्लॉट : आशा प्रकारच्या प्लॉट चे परिणाम जास्त करून वास्तूमध्ये वास्तव्य करणाऱ्या स्त्रियांना होतात, आर्थिक संकटे येतात, मानसिक स्वास्थ्य बिघडते तसेच मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा उत्पन्न होते.
 

(क) नैऋत्य कोपरा कट असलेला (L) आकाराचा प्लॉट :
अपघात, आर्थिक संकटे, मानसिक स्वास्थ्य, आजारपण आशा प्रकारच्या परिणामांना तोंड द्यावे लागते.
 

(ड) वायव्य कोपरा कट असलेला (L) आकाराचा प्लॉट : पैशाचा अकारण खर्च वाढतो, पैसा येतो तसा खर्चही होतो. मुलींच्या लग्न कार्यात अडथळे, शत्रुत्व निर्माण करतो, तसेच चोरीचे भय वाढते.
 


वस्तूच्या दिशा व पंचतत्वे

वास्तूमध्ये वास्तूचे लांबी व रुंदी प्रमाणे माधोमद उभी व आडवी रेषा मारल्यावर चार खंड तयार होतात. त्या खंडामध्ये अनुक्रमे ईशान्य दिशेकडे म्हणजेच ईशान्य खंडामध्ये जल तत्व, आग्नेय दिशेमध्ये म्हणजेच आग्नेय खंडामध्ये अग्नी तत्व आसते, नैऋत्य खंडामध्ये पृथ्वी तत्व व वायव्य खंडामध्ये वायू तत्व आसते. तसेच वास्तूचे लांबी व रुंदी प्रमाणे समान तीन उभ्या व आडव्या रेषा मारल्यावर एकूण समान ९ भाग होतात त्यातील मधील भाग हे वस्तूचे ब्रम्ह स्थान असते त्यामध्ये वास्तूचे ब्रम्ह म्हणजेच आकाश तत्व असते.

पुढील आकृतीवरून हि संकल्पना अधिक स्पष्ट होईल :

 

वास्तुपुरुष आणि त्याची मर्मस्थाने

वास्तुपुरुष आणि त्याची मर्मस्थाने या विषयाकडे आपण गांभीर्याने पहिले पाहिजे कारण वास्तू बांधण्यापूर्वी या सर्व गोष्टी आपण पहिल्या पाहिजेत वास्तू बांधण्याचा आराखडा म्हणजे प्लँन करताना वास्तुपुरुष्याच्या मर्मस्थानांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे कारण जर सांगायचे झाले तर मानवाच्या शरीरात जसे अक्कुप्रेशर बिंदू असतात व त्या त्या बिंदूवर आपण कमी अथवा जास्त असा दाब दिल्यावर शरीरातील ज्या त्या ठिकाणच्या वेदना कमी अथवा जास्त होतात त्या प्रमाणेच वस्तूतही वास्तुपुरुषाची षण्महन्ति, महामर्म तसेच उपमर्म असे विविध बिंदू असतात. वास्तू बांधताना वास्तुपुरुषाच्या या मर्मस्थानावर / बिंदूवर कोणतेही बांधकाम म्हणजेच या बिंदूवर खांब, तुळई, भिंत, खिडकी, दार तसेच इतर कोणतेही बांधकाम येणार नाही. याची काळजी घ्यावी लागते. वास्तुशास्त्र मध्ये सर्वात जास्त महत्त्व या गोष्टीकडे दिले गेले आहे. आपण वास्तुपुरुष एकाशितीपद मंडल हा विषय पहिला आहे त्या पदमंडळात आपण ज्या दक्षिणोत्तर व पुर्वपश्चिम ज्या उभ्या व आडव्या रेषा पहिल्या त्यांना वस्तूच्या शिरा म्हणजेच नाड्या आसे म्हणतात.

समरांगण सूत्रधार याच्या आध्याय क्रमांक १२, १३ मध्ये पुढील माहिती दिली आहे :

वास्तुपुरुषाच्या डोक्यात, मुखात, हृदयात, बेंबीत (नाभीत) तसेच वास्तुपुरुषाच्या दोन्ही स्तनावर जे बिंदू दर्शिवले आहेत त्यांना वास्तुपुरुषाचे षण्महान्ति बिंदू म्हणतात, वंश रेषा ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात त्या ठिकाणावरील बिंदुना महामार्मास्थान म्हणतात. तसेच उभ्या व आडव्या रेषा ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात त्या ठिकाणावरील बिंदुना उपमर्म स्थान असे म्हणतात.

या मर्म स्थानावर जर कोणतेही बांधकाम, खांब, खिडकी, दार, भिंत आली तर वास्तुपुरुषाच्या ज्या ज्या बिंदुना बाधा होईल त्या त्या ठिकाणी वास्तुमालकास तसेच त्या वास्तूमध्ये वास्तव्य करणाऱ्या वाक्तीस पिडा होते. म्हणून वस्तू बंध्तन या मर्म स्थानावर कोणतेही बांधकाम येणार नाही याची काळजी घ्यावी. थोडक्यात, वास्तू बांधण्याचा प्लान करताना या मर्मस्थानांचा खूप गाम्भिर्याने विचार करावा.

पुढील आकृतीवरून आपल्याला अधिकच स्पष्ट होईल :



वास्तु एकाशितिपद मंडल

वास्तु एकाशितिपद मंडल याचा उपयोग मनुष्यालय, चार वर्नातिल लोकांची निवास्स्थाने तसेच राजप्रसाद यांची रचना करण्यासाठी वस्तुशिल्पि म्हणजेच वास्तु स्थापति याने उपयोग करावा भवन निर्माण करताना तसेच भवनातिल विविध प्रभागासाठी याचा उपयोग होतो

वस्तुशास्त्रत कोणते कार्य कोणत्या देवतेच्या पदावर करावे याबद्दल खुप सुक्ष्म विचार केला गेला आहे तय प्रमाने जर वास्तु निर्माण झाले तर सुख, ऐश्वर्य, कल्याण, संपत्ति, संतति, आयुष्य याची प्राप्ति होते

वस्तुपदमंडलाच्या बाहेर ईशान्य कोनापासुन अनुक्रमे चरकी, स्कन्द, विदारी, अर्यमा (विकट), पूतना, जम्भं, पाप्रराक्षसी (पाप) पिलिपिच्छ हे बालग्रह येतात यांना मुख्या दिशा यांचे रक्षण करणारे दिक्पाल आशी संज्ञा दिली आहे त्या त्या प्रमाने त्या त्या दिशेवर त्यांचे प्रभुत्व आसते

पूर्व दिशेवर इन्द्र, आग्नेयावर अग्नि, दक्षिण वर यम्, नैऋत्य वर नैऋत्ती, पच्छिम दिशेवर वरुण, वायव्य दिशेवर वायु, उत्तरेवर सोम-कूबेर ईशान्य वर इशान हे दिकपाल आहेत


वास्तुपुरुषाच्या अंगावरील ४५ देवता

मयमतम (अ ), मत्स्यपुराण (अ २५३), समरंगाव सूत्रधार (अ १२) , अपराजितपृक्छा (अ ५६) इत्यादि ग्रन्थ संदर्भा नुसार वास्तुपुरुष्याच्या अंगावर स्थानापन्न आसलेल्या देवता पुढिलप्रमाणे आहेत :-

वास्तुपुरुष्याच्या डोक्याच्यावर म्हणजे शीर्ष या स्थानी शिखी ही देवता आहे, मुखावर आप ही देवता, छातीवर अपवस्त ही देवता येते । डाव्या स्तनावर पृथ्विधर ही देवता व उजव्या स्तनावर अर्यमा ही देवता येते । त्याच्या डाव्या नेत्रावर दिति व उजव्या नेत्रावर पर्जन्य ही देवता आहे, डाव्या कानावर आदिती व उजव्या कानावर जयंत ही देवता आहे, डाव्या खांद्यावर ऋषी (सर्प) व उजव्या खांद्यावर इन्द्र ही देवता आहे, डाव्या भुजेवर सोम (चंद्र), भल्लाट, मुख्य, नाग या देवता व उजव्या भुजेवर सूर्य, सत्य, भृष, अंतरिक्ष या देवता । डावा कोपर व गुडगा यावर रोग ही देवता येते । डावी मांडी, प्रकोष्ट व हातचे तळ्वे यावर रुद्र व रुद्रजय येतात । उजवा कोपर व गुडगा यावर अनिल ही देवता येते । उजवी मांडी, प्रकोष्ट व हातचे तळवे यावर सवित्र, सविता या देवता येतात । डावीकडील जांघेवर पापयक्ष्मा, शोष, असुर, वरुण, पुष्पदंत, सुग्रीव, दैवारिक या देवता आहेत । उजवीकडील जांघेवर पूषा, वितथ, ब्रृहत्क्षत, यम, गन्धर्व, भृंगराज, मृग या देवता आहेत । लिंगावर इन्द्र व इन्द्रजय या देवता आहेत । दोन्ही पायावर पितृ ही देवता आहे । पोट मित्र व विवस्वान यावर आहे । हृदयावर ब्रम्हा ही देवता आहे । मित्र व विवस्वान यावर पोट, जांघ आणि मंड्या यांचा भाग येतो तसेच आर्यामा व पृथ्वीधर या स्थानी हातांच्या तळव्यानजीकचा भाग येतो ।
 
    

वास्तु एकाशितिपद मंडल

वास्तु एकाशितिपद मंडल याचा उपयोग मनुष्यालय, चार वर्नातिल लोकांची निवास्स्थाने तसेच राजप्रसाद यांची रचना करण्यासाठी वस्तुशिल्पि म्हणजेच वास्तु स्थापति याने उपयोग करावा भवन निर्माण करताना तसेच भवनातिल विविध प्रभागासाठी याचा उपयोग होतो

वस्तुशास्त्रत कोणते कार्य कोणत्या देवतेच्या पदावर करावे याबद्दल खुप सुक्ष्म विचार केला गेला आहे तय प्रमाने जर वास्तु निर्माण झाले तर सुख, ऐश्वर्य, कल्याण, संपत्ति, संतति, आयुष्य याची प्राप्ति होते

वस्तुपदमंडलाच्या बाहेर ईशान्य कोनापासुन अनुक्रमे चरकी, स्कन्द, विदारी, अर्यमा (विकट), पूतना, जम्भं, पाप्रराक्षसी (पाप) पिलिपिच्छ हे बालग्रह येतात यांना मुख्या दिशा यांचे रक्षण करणारे दिक्पाल आशी संज्ञा दिली आहे त्या त्या प्रमाने त्या त्या दिशेवर त्यांचे प्रभुत्व आसते

पूर्व दिशेवर इन्द्र, आग्नेयावर अग्नि, दक्षिण वर यम्, नैऋत्य वर नैऋत्ती, पच्छिम दिशेवर वरुण, वायव्य दिशेवर वायु, उत्तरेवर सोम-कूबेर ईशान्य वर इशान हे दिकपाल आहेत

Wednesday, September 29, 2010

जरा आरशात पाहा!





भारतातील सुमारे ३० टक्के लोक पूर्णपणे भ्रष्ट आहेत. आणखी साधारणपणे ५० टक्के लोक ‘अर्धभ्रष्ट’ किंवा ‘तळ्यात-मळ्यात’ आहेत. उरले २० टक्के लोक. ते मात्र या भ्रष्टाचाराच्या महासागरात आपले चारित्र्य कसेबसे टिकवून ठेवत आहेत. भारतीय दक्षता आयोगाचे नुकतेच निवृत्त झालेले, प्रत्युष सिन्हा यांनी हे धक्कादायक (!?) निरीक्षण जाहीरपणे नोंदविल्यानंतर देशाचे केंद्रीय कायदेमंत्री वीरप्पा मोईली यांनी म्हटले आहे की, असे असत्य विधान करून सिन्हा यांनी देशाच्या अस्मितेला व अभिमानाला धक्का पोहोचविला आहे. मोईली यांच्या म्हणण्यानुसार, देशातील बहुसंख्य लोक प्रामाणिक व सत्शील नाही. याबद्दल आकडेवारीच्या हिशेबात आम्ही कधीच सांगू शकत नाही. हा अग्रलेख वाचणाऱ्यांनी स्वत:शी मनातल्या मनात ठरवावे की ते ३० टक्के पूर्णभ्रष्ट असलेल्यांपैकी आहेत, ५० टक्के अर्धभ्रष्ट असलेल्यांच्यात त्यांची गणना होईल की ते २० टक्के असलेल्या शुद्ध चारित्र्याच्या लोकांपैकी आहेत! भ्रष्टाचाराची व्याख्या आपण काय मानतो यावर बरेच काही अवलंबून आहे. सिन्हा यांनी ती व्याख्या दिलेली नाही. तरीही आपल्या आजुबाजूला आपण नजर टाकली तर सिन्हांचे निरीक्षण फारसे अतिशयोक्त वाटत नाही. पैशाच्या मोबदल्यात बेकायदेशीर (वा कायदेशीरही-वा कायद्यात बसवून!) काम करून देणे ही ढोबळ व्याख्या मानली तर त्यानुसार बहुसंख्य राजकारणी (नगरसेवक, पंचायत सदस्यांपासून ते निवडणुकीला उभे राहणारे- पडणारे वा जिंकणारे- उमेदवार, आमदार-खासदार, मंत्री इतकेच काय सर्व पक्षांचे विविध स्तरांवरचे पदाधिकारी आणि काही कार्यकर्तेसुद्धा) भ्रष्ट आहेत. पण बिचारे राजकारणी त्याबद्दल बदनामही आहेत. पण सरकारी नोकरशाहीत अगदी शिपायापासून ते सनदी अधिकाऱ्यांपर्यंत, साध्या कारकूनापासून ते संचालक-व्यवस्थापकापर्यंत प्रत्येक पायरीवर ‘पूर्णभ्रष्ट’ वा ‘अर्धभ्रष्ट’ लोक बहुसंख्येने आहेत, असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. पोलीस खाते तर कायद्याचे नाही तर ‘काय द्यायचे-घ्यायचे’ हे बोला या तत्त्वावर चालते. तीच गोष्ट आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, शहर वा ग्रामविकास खात्याची आहे. न्यायालयांमध्येही भ्रष्टाचार ओतप्रोत भरला आहे, असे कुणी जाहीर विधान केले तर त्याच्यावर ‘न्यायालयाचा अवमान’ केल्याचा आरोप होतो, म्हणून बहुतेक जण ते विधान खासगीत करतात आणि आपण कोणत्या कोर्टात, खालपासून वपर्यंत कसे कुणालाही ‘फिक्स’ करू शकतो, याच्या सुरस व चमत्कारिक कथा सांगतात. कोणताही न्यायमूर्ती वा न्यायालयीन कर्मचारी कुणाच्या ‘साक्षी’ने पैसे वा अन्य लाभ घेत नाही. त्यामुळे या सुरस कथांपैकी किती खऱ्या, किती खोटय़ा हे खात्रीलायक सांगता येणार नाही. परंतु सिन्हा यांनी दिलेली आकडेवारी खरी मानली तर न्यायसंस्थेतही ३० टक्के पूर्णभ्रष्ट आणि ५० टक्के अर्धभ्रष्ट लोक आहेत, असे मानावे लागेल. हा सर्व भ्रष्टाचार वर म्हटल्याप्रमाणे ‘मोबदल्यानुसार’ काम करून देण्याचा आहे. मीडिया ऊर्फ पत्रकारिता अवघ्या जगाला नीतीमत्तेचे व शहाणपणाचे धडे देत असतो; पण त्यांचेही पाय किती चिखलात आहेत हे ‘पेड न्यूज’ प्रकरणाने वेशीवर टांगले गेले आहेच. शिक्षक-प्राध्यापक-शिक्षण व्यवस्थापन क्षेत्रातही आता पूर्ण शुचिर्भूत व्यक्ती दाखवा आणि ‘एक हजार रुपये मिळवा’ अशी योजना जाहीर करावी लागेल. लोकांच्या जीवाशी थेट भिडणाऱ्या आरोग्य क्षेत्रात- डॉक्टर्सपासून, हॉस्पिटल व्यवस्थापन ते औषध कंपन्यांपर्यंत भ्रष्टाचार काठोकाठ भरला आहे, असा लोकांचा अनुभव आहे. असाही एक समज आहे वा होता की भ्रष्टाचार फक्त सार्वजनिक क्षेत्रात वा सरकार-दरबारी होतो आणि ‘खासगी’ क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त आहे. भांडवलशाहीच्या कट्टर समर्थकांनी समाजवादी विचासरणीवर व व्यवस्थेवर कडाडून हल्ला चढविताना ही टीका अधिक धारदार केली होती. याउलट समाजवादी-साम्यवादी विचारांची मंडळी असे सांगत की, भांडवलशाही हाच भ्रष्टाचाराचा मुख्य स्रोत आहे! या दोन्ही कट्टरपंथी दाव्यांचा काही वर्षांत पुरा खुळखुळा झाला आहे. समाजवादी रशिया व पूर्व युरोपात भ्रष्टाचार इतका सार्वत्रिक होता की, सामान्य माणसाचे जीवन पूर्णत: उद्ध्वस्त आणि विषण्ण झाले होते. म्हणजेच मार्क्सवादी दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची खासगी मालकीची उत्पादनव्यवस्था साम्यवादी रशियन अर्थकारणात नसतानाही तेथे प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होता. पुढे खुद्द त्यांचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनीच म्हटले, की रशियन समाज भ्रष्टाचाराने इतका पोखरलेला आहे, की एक प्रकारच्या नैतिक क्रांतीशिवाय ती कीड दूर होणार नाही. लोकशाहीकरण (ग्लासनोस्त) आणि पुनर्रचना (पेरेस्त्रॉइका) या दोन सूत्रांच्या आधारे कम्युनिस्ट रशियाचे राजकीय चारित्र्य शुद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; पण तो फसला आणि देशच लयाला गेला; परंतु समाजवादी सोविएत युनियनचे विघटन झाल्यानंतर रीतसर भांडवलशाही तेथे रुजू शकली नाही. पहिली १० वर्षे तरी भ्रष्टाचारी व्यवस्थेची जागा माफिया व्यवस्थेने घेतली आणि अगोदरइतकीच वा अधिक क्रूर सिस्टीम तेथे आली. भांडवलशाही अमेरिकेत, युरोपात व जपानमध्ये आणि चीनच्या लाल भांडवलशाहीतही प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार असला तरी त्याचे स्वरूप व जाच एकाच प्रकारचा नाही. अमेरिकेतील ‘हाय लेव्हल’ आणि ‘कॉर्पोरेट’ भ्रष्टाचाराचा दैनंदिन व ठायीठायी जाच सामान्य माणसाला होत नाही. ब्रिटनमधील नोकरशाही आता एका यंत्राप्रमाणे चालते आणि त्यामुळे तेथेही ‘हात ओले’ करून काम होत नाही. जेथे भांडवलशाहीने अजून पूर्ण मूळ धरलेले नाही (भारत, चीन, रशिया, इंडोनेशिया इ.) तेथे भ्रष्टाचार समाजाच्या प्रत्येक अवयवात घुसतो आणि एखाद्या संसर्गजन्य रोगाप्रमाणे त्याची साथ निर्माण होते. (गेल्या शतकात युरोप- अमेरिकेतही हा ‘साथी’चा भ्रष्टाचार  मोठय़ा प्रमाणावर होता.) भारतातील दक्षता आयोगाचे माजी अध्यक्ष सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार, या साथीची लागण ८० टक्के भारतीयांना झालेली आहे. सर्वानाच जरी हा भ्रष्टाचाराचा ‘एड्स’ झाला नसला तरी ‘एचआयव्ही पॉझिटिव’ स्थिती बहुसंख्यांची आहे. कायदामंत्री मोईलींना हे निरीक्षण मानवणारे नसले तरी बहुतेक लोकांच्या अनुभवाला हा भ्रष्टाचार रोज येत आहे. तो एखाद्या वटहुकुमाने दूर होऊ शकणार नाही, अधिक पोलीस दल ठेवून निपटून टाकता येणार नाही वा ‘लष्करी हुकुमशाही’ आणून आटोक्यात येणार नाही. शेजारी पाकिस्तानात तर भ्रष्टाचाराने ‘एचआयव्ही पॉझिटिव’सदृश स्थिती ओलांडून त्याचे व्यापक ‘एड्स’मध्ये रुपांतर झाले आहे. अनेक मध्यमवर्गीय (सुशिक्षितांचा) असा समज आहे, की ‘लष्कर’ फार पवित्र असते आणि लष्करी राजवट सर्व अर्थकारण शुद्ध करू शकेल. प्रत्यक्षात हे लक्षात घ्यायला हवे, की सेनादलांमध्येही वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचार पसरलेला आहे. काहींना अतिशयोक्त वाटेल, पण असे विधान करायचे तर भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यातील एक मोठी अडचण दोन्ही देशांतील सेनादले हीच आहे. सुमारे अडीच लाख कोटी रुपये हे दोन्ही देश केवळ सेनादलांवर, शस्त्रास्त्र खरेदीवर व सीमा सांभाळण्यावर खर्च करतात. यापैकी किमान ३० ते ४० टक्के रक्कम ही भ्रष्टाचारात गडप होते- ज्याप्रमाणे सेनादलांना अत्यंत स्वस्तात मिळणारी दारू खुल्या बाजारात येऊन थडकते त्याप्रमाणे. लष्कराच्या हातात सूत्रे असूनही पाकिस्तान मागासलेला, दरिद्री, कुपोषित आणि उद्ध्वस्त स्थितीत आहे. भारतातील सेनादलेही धुतल्या तांदुळासारखी नाहीत. म्हणजेच भ्रष्टाचार सर्व क्षेत्रात आहे. अगदी स्वत:ला प्रामाणिक समजणाऱ्या मध्यमवर्गातही. नवीन ‘टू बीएचके’ वा ‘थ्री बीएचके’ घेताना (ब्लॅक-व्हाइट) करार हा मध्यमवर्गच करतो आणि मुलाला उच्च शिक्षणासाठी ‘ब्लॅक-व्हाइट’ कॅपिटेशन फीसुद्धा हाच मध्यमवर्ग देतो. भ्रष्टाचार अनेक रुपांतून प्रगट होतो. फक्त पैशाच्या देवघेवीतून नव्हे. वशिलेबाजी, चमचेगिरी, संधीसाधूपणा, ‘नेटवर्किंग’, त्याचप्रमाणे तथाकथित ‘कीलर इन्स्टिन्क्ट’ आणि ‘कटिंग कॉर्नर्स’ वा ‘शॉर्ट कट्स्’ हीही भ्रष्टाचाराची रूपे आहेत. त्या दृष्टिकोनातून सिन्हा यांनी म्हटल्याप्रमाणे देशात ३० टक्के ‘पूर्ण भ्रष्ट’ आणि ५० टक्के ‘अर्ध भ्रष्ट’ लोक आहेत, असे म्हणावयास हरकत नाही. आपल्या देशातील प्रत्येकाने स्वत:चे चारित्र्य आरशात पाहावे आणि ठरवावे, की देशाचे चारित्र्य कसे आहे!  

धन्यवाद लोकसत्ता ... ....    Link to original article

Sunday, September 19, 2010

न्यायालय , सरकार आणि शेतकरी - अन मोफत धान्य


बादशहाच्या मंत्रिमंडळात सरळसरळ दोन तट पडले होते. राज्यातील हजारो गोदामांमध्ये धान्य साठविण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. हजारो पोती धान्य बाहेरच ठेवण्यात आले होते. पावसामुळे ते लाखो टन धान्य कुजून वाया चालले होते. हे सर्व धान्य गरीब आणि भुकेल्यांमध्ये वाटून देण्यात यावे, असा आदेश न्याय खात्याच्या वरिष्ठानं दिला होता. त्याचा हा आदेशच बादशहाच्या मंत्रिमंडळात दोन गट पाडण्यास कारणीभूत ठरला होता. दोन्ही गट हिरीरीनं आपली बाजू मांडत होते. फुकट धान्य वाटलं तर लोक माजतील, बाजारातील धान्याचे भाव खाली येतील, व्यापाऱ्याचं नुकसान होईल, लोकांना फुकटचं खायची सवय लागेल, शिवाय ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत धान्य न जाता ते भलतेच लोक पळवतील, अशा हरकती एक गट घेत होता. तर दुसरा गट न्यायखात्याच्या आदेशाकडे दयाबुद्धीनं पाहत होता. धान्य खाऊन उंदीर माजतील, त्यापेक्षा माणसं माजली तर काय हरकत आहे? एका बाजूला धान्य सडते आहे आणि दुसऱ्या बाजुला माणसं उपाशी मरत आहेत, हे राज्याला शोभतं का? बादशहाला काही भावना आहेत की नाहीत? धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या नुकसानाची काळजी करण्यापेक्षा कष्टकरी गरिबांचं पोट भरणं महत्त्वाचं नाही का? असे प्रश्न दुसऱ्या बाजूकडून विचारले जात होते. दोन्ही बाजू आपापल्या परीनं योग्य होत्या. दोन्ही बाजूंचे मुद्दे विचार करण्यासारखे होते. त्यामुळे अगदी हमरीतुमरीवर येऊन चर्चा सुरू होती. बादशहा गोंधळून गेला होता, कारण कोणतीही बाजू घेतली तरी ते अडचणीचं होतं. याच मुद्दय़ाच्या आधारे भविष्यात इतर प्रश्नांचीही सोडवणूक करण्याचा पायंडा पडण्याची भीती होती. बादशहाच्या दृष्टीनं त्यातही अधिकच काळजीचा विषय हा होता की, संपूर्ण चर्चेत बिरबलानं तोंडही उघडलेलं नव्हतं. आणि या प्रकरणी बिरबल निरूत्तर झाल्याचं दिसत असल्यानं दोन्ही गटांमधील बिरबलाच्या विरोधकांना अधिकच चेव आला होता. अखेर बादशहानं जेव्हा अगदीच कासावीस होऊन बिरबलाकडे पाहिलं, तेव्हा बिरबल उभा राहिला. सगळे शांत झाले. बिरबलानं बादशहाला कुर्निसात केला आणि म्हणाला, ‘हुजूर, आपण आधी हे मान्य केलं पाहिजे की दोन्ही बाजूंचे मुद्दे आणि हरकती अगदीच योग्य आहेत.’ बादशहा म्हणाला,‘बिरबल, ते मान्य आहे म्हणूनच तर गंभीर पेच निर्माण झाला आहे ना?’ मग बिरबलानं चौफेर नजर फिरवली आणि म्हणाला, ‘दोन्ही बाजूचे मुद्दे जरी योग्य असले तरी ही चर्चा फिजूल आहे, असं मला वाटतं.’ बादशहासह सगळेच आश्चर्यचकित होवून पाहू लागले. बिरबल पुढे म्हणाला, ‘मोफत धान्य वितरित करणं योग्य की आयोग्य यावर आपण बोलू शकतो. परंतु ते करावं की करू नये, यावर चर्चा करू शकत नाही.’ बादशहा गोंधळला व म्हणाला,‘म्हणजे?’ बिरबल हसला व म्हणाला, ‘म्हणजे असं की, न्याय खात्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्यानं धान्य मोफत वितरित करण्याचा आदेश दिला आहे. तो पाळणं बंधनकारक आहेच. तो पाळण्यात यावा आणि मगच चर्चा जरी ठेवावी! माझ्या मते,न्यायासनाचा आदेश पाळण्याची बांधिलकी स्वीकारायची की नाही हा चर्चेचा विषय होऊच शकत नाही.तो योग्य की अयोग्य यावर मात्र चर्चा होऊ शकते.’ बादशहानं बिरबलाकडे ज्या नजरेनं पाहिलं त्यात केवळ कौतुक किंवा कृतज्ञता नव्हती!

Thanks to लोकसत्ता Link to original article

Sunday, September 5, 2010

मुलांच्या निरागस भावविश्वाला वास्तवाचे चटके देणं म्हणजे सगळा आनंद घालवणं आहे

राज्यभर सगळीकडे धुवाँधार पाऊस सुरू होता. सर्व नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सगळे व्यवहार थंडावले होते. रस्त्यांवर वर्दळ नव्हती. दुकाने बंद होती. बादशहा आपल्या महालाच्या नक्षीदार झरोख्यातून आभाळाची माया बरसताना पाहत होता. भरपूर पाऊस पडत असल्याने तो वारंवार परवर दिगारचा शुक्रियाही अदा करीत होता. एकूणच काही कामकाज नसल्याने तो दोन बेगम व त्यांच्या मुलांसाठी वेळ देत होता. मुलांनी आग्रह केला तेव्हा त्यांनी त्यांची गोष्टीची पुस्तके वाचली. जादूच्या, राक्षसांच्या, राजा-महाराजांच्या, राजपुत्रांच्या, शूरवीरांच्या अशा प्रकारच्या भरपूर गोष्टी त्याने मजेने वाचल्या आणि मग अचानक त्याच्या लक्षात आले, सर्व गोष्टींचे शेवट ‘आणि ते सुखाने नांदू लागले’ असाच असे. बादशहा विचार करू लागला आणि मग त्याला ते अधिकच खटकू लागले. त्याने सांस्कृतिक मंत्र्याला तातडीने बोलावून घेतले व ‘बाल साहित्याची स्थिती कशी आहे?’ असा प्रश्न केला. मंत्री खरे तर हादरलाच. बादशहाला अचानक बाल साहित्याच्या स्थितीची चिंता का पडावी आणि त्याच्या मनात नेमके काय आहे ते त्याला कळत नव्हते आणि तसे स्पष्ट सांगण्या- विचारण्याचीही सोय नव्हती. मंत्री कामाला लागला व त्याने दोन दिवसांत बादशहाला आपला अहवाल सादर केला. ‘‘हुजूर, आपल्या राज्यात बालकथा लिहिणारे साधारणत: पाचशे लेखक आहेत. वर्षभरात जवळपास ३ हजार पुस्तके प्रकाशित होतात आणि त्यातल्या उत्कृष्ट पुस्तकांना आपण पुरस्कारही देतो’’ बादशहानं नाराजीनं मान हलविली आणि म्हणाला, ‘‘यापैकी बहुतांश कथांचे शेवट.. आणि ते सुखानं नांदू लागले.. अशा वाक्यानं होतो. लहान मुलांची ही दिशाभूल आहे. दु:ख, निराशा, अपयश, अपेक्षाभंग हा जीवनाचा एक भाग आहे हे त्यांना कळू द्या, सर्व लेखकांना तसे आदेश द्या.’’ मंत्री हवालदिल झाला आणि मान हलवून ‘जी खाविंद’ म्हणाला. आठवडाभरानं पाऊस जरा कमी झाला आणि मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा बादशहानं मंत्र्याला पुढील कारवाईबाबत विचारणा केली. मंत्र्यानं बिरबलाकडे पाहिलं तेव्हा बिरबलानं त्याला, काळजी करू नकोस, असं नजरेनंच सांगितलं. बैठक संपल्यावर बिरबल बादशहाच्या समवेत राजवाडय़ावर गेला. त्याच्या आदेशाप्रमाणं तिथं एक नक्षीदार पेटी आधीच आणून ठेवलेली होती. बिरबलानं इशारा करताच सेवकांनी ती पेटी उघडली आणि सोनेरी नक्षीनं वेढलेली बादशहाची एक तस्वीर त्यातून काढली. बिरबलानं तसबिरीला हार घातला, समोर उदबत्त्या लावल्या आणि हात जोडले. ते पाहून बादशहा लाल होऊन संतापानं थरथरू लागला. ‘बिरबल, तू काय चालविलं आहेस हे?’ बिरबल शांतपणे म्हणाला, ‘हुजूर, मी, तुम्ही, आपण सगळेच कधी तरी मरणार आहोत. तुमच्या मुलांना आपण आताच हे सत्य सांगून टाकावं असं वाटलं मला!’ अर्थातच सर्व प्रकार बादशहाच्या ध्यानी आला व तो वरमला. बादशहाची ती मुद्रा पाहून बिरबल म्हणाला, ‘‘खाविंद, मुलांच्या निरागस भावविश्वाला वास्तवाचे चटके देणं म्हणजे सगळा आनंद घालवणं आहे. जगात खूप काही चांगलं आहे, अशी आशा त्यांच्या मनात निर्माण करणं आवश्यक असतं, ती मोठी होतात आणि या आशेच्या बळावरच वास्तवाला सामोरी जातात!’’ बादशहा म्हणाला, ‘सुखानं नांदू लागले’चं महत्त्व मला खरंच कळत नव्हतं. बिरबल हसत म्हणाला, ‘‘खाविंद, लहान मुलांच्या पुस्तकांविषयी तुम्ही एवढय़ा गांभीर्यानं विचार केला ते मला जास्त महत्त्वाचं वाटलं.’’ ढगाळ वातावरणात उत्तम प्रतीचा चहा घेण्यासाठी बिरबलानं मग आग्रह करून शिक्षण मंत्र्यालाही बोलावून घेतलं!

धन्यवाद लोकसत्ता ... ....    Link to original article

गोविंदा ... दहीहंडी : मूठभर निराशेतली चिमूटभर आशा !

पावसामुळं सगळे व्यवहार थंडावलेले होते. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीला उपस्थित असलेले सर्व मंत्रीही आळसावलेले होते. सगळं वातावरण असं सुस्तावलेलं पाहून बादशहानं रेशमी कबाब बनविण्याचा आदेश दिला. खमंग कबाब आणि पुदिन्याची ताजी पाने चांदीच्या नक्षीदार थाळ्यांमध्ये आली तेव्हा मग शेरो-शायरी गप्पा यांना ऊत आला. एकेक मजेदार किस्से सांगितले जाऊ लागले आणि वातावरण अगदी खुमासदार झाले. मध्येच बादशहानं हात उंचावला आणि म्हणाला, ‘तुम्हा सगळ्यांनाच माझा एक प्रश्न आहे, ज्याचं तुम्ही उत्तर द्यायचं ते लगेच सिद्धही करून दाखवायचं आणि उत्तर वैशिष्टय़पूर्णही हवं!’ सर्व मंत्र्यांनी एका स्वरात उत्तर दिलं, ‘कुबुल खाविंद!’ मग बादशहानं मसालेदार चहाचा एक घोट घेतला व आपला प्रश्न विचारला, ‘जगण्यासाठी काय हवं असतं?’ सर्व मंत्री, हा म्हटलं तर सोपा आणि म्हटलं तर अवघड प्रश्न ऐकून विचारात पडले. प्रश्नाचं उत्तर लगेचच सिद्ध करणं हे एक मोठं आव्हान होतं. अखेर एक ज्येष्ठ मंत्री उभा राहिला आणि म्हणाला, ‘खाविंद, जगण्यासाठी सुख हवं असतं असं मला वाटतं, परंतु ते आत्ता लगेच सिद्ध नाही करता येणार!’ बादशहा म्हणाला, ‘सुखाचा लवकरच कंटाळा येतो हे सार्वकालिक सत्य आहे.’ प्रत्येक मंत्री मनातल्या मनात बादशहाच्या प्रश्नाचं उत्तर जुळवत होता; परंतु ते उत्तर लगेचच सिद्ध कसं करावं हा पेच त्याला पडत होता. अखेर सर्व मंत्री बिरबलाला आग्रह करून म्हणाले, ‘आता तूच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकशील.’ मग बादशहानंही आग्रह धरला तेव्हा बिरबल म्हणाला, ‘जगण्यासाठी मूठभर निराशा आणि चिमूटभर आशा हवी असते आणि यात कोणत्याही काळात बदल झालेला नाही, होणारही नाही.’ बादशहानं उत्तरावर समाधान व्यक्त केलं आणि म्हणाला, ‘परंतु हे तू आत्ताच्या आत्ता सिद्ध कसं करून दाखवशील?’ बिरबल म्हणाला, ‘दाखवतो, पण त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत इथून बाहेर पडावं लागेल.’ मग सगळेच तिथून एकत्र बाहेर पडले. बाहेर एका चौकात प्रचंड गर्दी होती. लोक मद्यधुंद, बेहोष होऊन नाचत होते. चौकाच्या मध्यभागी पन्नास लाखांची दहीहंडी बांधलेली होती. त्या गर्दीला गोविंदाच्या सांस्कृतिक परंपरेशी काही देणं-घेणं नव्हतं. सर्वाचं लक्ष होतं पन्नास लाखांवर! ते पाहून बादशहा भयंकर निराश झाला. मग बिरबल बादशहाला घेऊन दुसऱ्या एका चौकात गेला, तिथं दहीहंडीला पैसे वगैरे नव्हते, फक्त दहीकाल्याचे मटके बांधलेले होते, काही लोक उत्साहाने पाणी फेकत होते, परंतु गर्दी नव्हती. खरं तर शुकशुकाटच होता. ते पाहून बादशहा म्हणाला, ‘पैसे नसूनही गोविंदा मंडळं थर उभारताहेत ही केवढी आनंदाची गोष्ट आहे!’ बिरबल म्हणाला, ‘‘यालाच मी मूठभर निराशेतली चिमूटभर आशा म्हणतो!’ बिरबलाच्या या उत्तरानं खूश झालेल्या बादशहानं संपूर्ण मंत्रिमंडळालाच आग्रहानं दुपारच्या शाही खान्यासाठी थांबवून घेतलं!

धन्यवाद लोकसत्ता ... ....    Link to original article